Friday, 26 February 2016

गूढी उभारून हिंदूत्वाचा जयजयकार करा...!

गुढी चा संभाजी राजांच्या हत्तेचा स्पष्ट संबंध नाहीये त्यांची क्रूरपणे हत्या केली त्यादिवशी फाल्गुन अमावास्या होती, दुसर्या दिवशी गुढी पाडवा होता. , हिंदू लोक त्यांचा सण साजरा करू नये म्हणून ही औरंगजेबाची गलिच्छ चाल होती.... गुडी ही आधीपासुन उभारली जाते. संर्दभ पहा
.
• इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट
सराळेकर रचीत लीळाचरित्रात,
लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये
".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते :
तेयापूढें सांघीतलें : मग
तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक
रंगमाळीका भरवीलीया :
गुढी उभविली :
उपाहाराची आइति करविली : आपण
घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख
येतो.
• संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–
१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६
आणि १४ मध्ये
"अधर्माचि अवधी तोडीं ।
दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥
५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी ।
ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥
५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी ।
विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे
सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे
उल्लेख येतात.
• संत नामदेवजी नामदेव
(इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत
जनाबाई (निर्वाणइ.स. १३५०)
आणि त्यांचेच समकालीन संत
चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात
वर्ष - इ.स. १३३८)
यां सर्वांच्या लेखनात, गुढीचे उल्लेख
येतात.
• संत चोखोबा त्यांच्या अभंगात
म्हणतात
"टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट हे चालावी पंढरीची ॥१॥"
• १६व्या शतकातील संत
एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मीक
काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य
वेळा अवतरतो.
त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत
एकनाथ हर्षाची उभवी गुडी,
ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य,
यशाची, रामराज्याची रोकडी,
भक्तीची, जैताची, वैराग्याची,
भावार्थाची, स्वानंदाची,
सायुज्याची,
निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके
वापरताना आढळतात.
अजून एक वैशीष्ट्य या गुढीचे दिसून येते
वारी असो अथवा रणांगण
असो जाणाऱ्या समूहा पैकी चपळ
माणूस पाहून त्याकडे
हि गुढीची काठी दिली जात असे.
4529 गाथेत संत तुकाराम
त्यांच्या अभंगात म्हणतात "पुढें
पाठविलें गोविंदें गोपाळां ।
देउनि चपळां हातीं गुढी ॥2॥"
.
आता तुम्हीच ठरवा गूढी न उभारून आपल्या संभाजी राज्याच्या हिंदूत्वाचा विरोध करायचा.
की, गूढी उभारून हिंदूत्वाचा जयजयकार करून, संभाजी राज्याला श्रद्धांजली व्हायची...

Tuesday, 16 February 2016

कृष्णाजी भास्कर - वास्तव!

सदर लेख इतिहास अभ्यासक श्री. कौस्तुभ कस्तुरे यांचा आहे.
***
१६५६ च्या मार्च - एप्रिल मध्ये जावळी काबीज केल्यावर गडपति असणाऱ्या शिवछत्रपतींनी जावळीच्या पश्चिमेस प्रतापगड बांधला.
पुढे मार्गशीष शुध्द सप्तमीला अफजलखानाला भेटीला बोलावून त्याने पहिला वार करताच त्याचा कोथळा बाहेर काढला हे तर आता आपल्या इयत्ता ४थीतला विद्यार्थी सुध्दा सांगेल.
ऐन भेटीच्या वेळी नक्की काय घडले होते?
अफजलखानाच्या पोटातला कोथळा बाहेर काढला म्हणजे शिवछत्रपतींचा खांद्यावरील भाग खानाच्या पकडित असला पाहिजे आणि शिवछत्रपतिंनी पोटाच्या खालच्या बाजूने वार केल्यानेच कोथळा बाहेर लोंबू लागला .
आता वार कसा केला? काय काय वापरल असावं? वाघनखं? बिचवा? की तलवार??
वाघनखाने एवढी मोठी जख़म होणे आणि कोथळा बाहेर येणेे शक्य नाही.
हो त्याने आतडी बाहेर काढण्यास नक्कीच मदत झाली असावी.
पुरावे सांगतात की वाघनखे घुसवुन बिचवा (एकधारी लहान तलवार ) मारला आणि त्याचा कोथळा बाहेर काढला .
हं..आता मात्र आपल्याला फार सावधपणे पुढील इतिहासात शिरायचं आहे!
इथे येतो तो कृष्णाजी भास्कर! हां खानाचा वकील.
याच्या तपशीलात आता आपण शिरूया...
सभासद प्रत्यक्ष भेटीबद्दल काय लिहीतो ते पाहू -
“खानही उभा राहून, पला. राजियांची मुंडी कवटाळून खाकेखाले धरिली राजानाने आणि हातीची जमदाड होती तीचें मेण टाकून कुशिस राजेयाचे चालविली. तो आंगात जरिची कुडती होती त्यावरी खरखरली. आंगास लागली नाही. हे देखोन राजियांनी डावे हाताचे वाघनख होते तो हात पोटात चालविला. खानाने आंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करिताच खानाची चरबी बाहेर आली. दुसरा हात, उजवें हातचें बिचवियाचा मारा चालविला.ऐसे दोन वार करोन (महाराज), मुंडी आसडोन {हिसडा देऊन} चौथरियाखाली उडी घालोन निघोन गेले.
खानाने गलबला केला की, ‘मारिले! मारिले! दगा दिधला! बेगी {लवकर} धावा !!’
असे बोलताच भोयांनी पालखी आणिली आणि पालखीत घालून, (खानाला) उचलून चालविला.
इतकियात संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारीले {कापले} आणि पालखीवाले भोयांस पाडिले. खानाचे डोचके कापिले {व} हाती घेऊन राजियाजवळ आला. इतकियात सैद बंडा पटाईत धावला. त्याने राजे जवळ केले. पट्ट्याचे वार राजियावरी चालविले. तो राजियाने जिऊ माहालियाजवळ हुद्दियाचा पट्टा होता तो घेऊन पट्टा वा बिचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले {अडवले}. पाचवे हातें राजियांस मारावे तो इतकियात जिऊ माहाला याणे फिरंगेने खांद्यावरी सैदबंडियासी वार केला. तो पट्टियाचा हात हत्यारा समेत तोडिला आणि खानाचे शीर समेत घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ माहाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.”
हा कृष्णाजी अनंत सभासदाने- महाराजांचा समकालीन- लिहीलेला वृत्तांत आहे. या सबंध वृत्तांतामध्ये खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी महाराजांवर वार केल्याचा अथवा महाराजांनी कृष्णाजीला मारल्याचा ओझरता उल्लेख नाही.
शेडगावकर भोसल्यांच्या बखरीतही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी महाराजांवर वार केल्याचा अथवा महाराजांनी त्यांना ठार मारल्याचा उल्लेख नाही.
शिवकालीन पुराव्यांमधील एक अत्यंत विश्वसनिय मानला जाणारा पुरावा म्हणजे जेधे यांची शकावली.
जेधे शकावली तर कृष्णाजी भास्करांना मारल्याचा किंवा त्यांनी राजांवर वार केल्याचा उल्लेख नाही.
शिवापूरकर देशपांड्यांच्या वहितील शकावलीमध्ये सुद्धा
“शके १५८१ विकारीनाम संवत्छरे मार्गसीर्ष शु॥ ७ गुरुवारी आठवे तासी प्रतापगडानजिक सिवाजीराजे यांणी आफजलखानासी येकांगी करून आबजलखान जिवे मारीला सिर कापिले ” असा उल्लेख असून यामध्ये कृष्णाजी भास्कराला मारल्याचा उल्लेख नाही.
अज्ञानदासाच्या पोवाड्याचा उल्लेख करणे गरजेचे आहे. हा पोवाडा अज्ञानदासाने, महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून राजगडावर आल्यावर लगेच जखमनाम्याच्या दरबारात महाराजांसमोर गायला होता. या पोवाड्यात अज्ञानदास शाहीर म्हणतो,
“अबदुलखान पुरा झाला । कृष्णाजी ब्राह्मण उठावला ॥ शिवाजी राजा बोलला । ब्राह्मणां, मारू नये तुजला॥
तुजशी मारता।शंकर हासेल आम्हाला॥ नाईकता ब्राह्मणे । हात दुसरा मारीला॥
ब्राह्मणा मारू नये तुला।
क्रिया शहाजीची आम्हाला॥
कृष्णाजी ब्राह्मणे ।
हात तिसरा टाकीला ॥
होईल ब्रह्महत्या भोसल्यांसी। शिवाजीने राखिला॥
कृष्णाजी ब्राह्मण मागे सरला।
सैद बंडू मोहरे आला ॥“
कविंद्र परमानंद नेवासकर यांचे “अनुपुराण" यालाच आपण 'शिवभारत' म्हणतो.
सर्वोच्च पुरावा!
यात परमानंदांनी जे वर्णन केले आहे ते असे-
“ब्राह्मणास शिवाजीराजा ठार मारणार नाही असे जाणून धनी अफजलखानाने त्या ब्राह्मणास युद्धात (त्या प्रसंगात) निविष्ट केले होते (शि.भा.-२१:४७).
तो ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतिने वागणार्‍या शिवाजीराजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही (शि.भा.-२१:४८).
अफजलखानाचे सैनिक तेथे पोहोचले नाहीत तोच त्याने ती तलवार शिवाजीराजावर हाणली (शि.भा.-२१:४९).
त्याने मारलेली ती तरवार त्या समयी शिवाजीराजाने आपल्या तलवारीने अडविली. आणि पट्ट्याने त्याच्या धन्याच्या डोक्याचेही तुकडे केले (शि.भा.-२१:४७)”.
परंतू या सार्‍या हकीकतीत कविंद्र परमानंदांनी कुठेही कृष्णाजी भास्करांना ठार मारले असा ओझरताही उल्लेख करत नाहीत. किंबहूना महाराजांनी त्यांस ठार केलेच नाही असंच यात म्हंटल आहे .
अफजलखानाच्या वधानंतर खानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांना महाराजांनी आपल्या पदरी ठेऊन घेतले असावे जसे नाईकजी पांढरे, सिद्दी हिलाल, नाईकजी खराटे इत्यादी अनेक लोकांना ठेवले होते तसे.
हे कृष्णाजी भास्कर पुर्वी अफजलखानातर्फे वाई परगण्याचे हवालदार होते (भा.इ.सं.मं. त्रैमासिक वर्ष ७ मधील अफजलखानाचे पत्र).
वाईच्या उत्तरेला असणार्‍यातील एक कागद हा वेलवंडखोर्‍यातील डोहर देशमुख यांच्यातील तंट्याचा इ.स. १६६९-७० रोजीचा महजरनामा आहे.
या महजराच्या वेळी खुद्द महाराज उपस्थित होते. या कागदात कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख वेळवंड्खोर्‍यातील सुभेदार असा आहे.
दुसरा कागद हा तालुके चौल येथील देशमुख-देशपांडे, शेट्ये-महाजन यांना शिवाजी महाराजांनी इ.स. १५ नोव्हेंबर १६७१ रोजी पाठवलेल्या खरमरीत आज्ञापत्र उपलब्ध आहे
या दोन्हीही कागदांवर (महजरनाम्यावर आणि आज्ञापत्रावर) कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख सुभेदार असा आला आहे.
तिसरा कागद हा इ.स. १६७१-७२ चा जाबिता तह आहे, या तहाच्या अग्रभागी महाराजांची ‘प्रतिपच्चंद्रलेखेव’ ही राजमुद्रा तसेच शेवटी ‘मर्यादेयं’ ही मर्यादा मोर्तब आहे.
या तहनाम्यातही कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख आहे.
आता आपण इतिहास संशोधक काय म्हणतात ते पाहूया-
● यदुनाथ सरकार यांच्या
Shivaji and His Times मध्ये ते अफजल वधावर लिहिताना कृष्णाजी भास्कर याने तलवार उचलली त्याला शिवछत्रपतींनी मारला असा उल्लेख केलेला नाही.
● सेतुमाधवराव पगड़ी यांनी सुध्दा त्यांच्या 'शिवचरित्रात या संबंधी उल्लेख करत नाही.
● मराठी रियासत भाग २- 'शककर्ता शिवाजी' यात सुध्दा याचा उल्लेख नाही.
● Grant Duff याच्या 'मराठ्यांची बखर' यातही कृष्णाजीला मारल्याचा उल्लेख नाही.
● वा. सी. बेंद्रे यांनीच पहिल्यांदा हां मुद्दा लावून धरला होता की ,
"कृष्णाजी भास्करबाबत बराच गैरसमज झालेला आहे . कृष्णाजी भास्करने शिवछत्रपतिंना अफजलखानाच्या मनात कपट आहे हे सांगितले .
पुढे हां कृष्णाजी भास्कर जिवंत होता " असे ते आपल्या 'श्री छत्रपति शिवाजी महाराज' या ग्रंथात लिहितात.
मग अफजल वधानंतर जर कृष्णाजी भास्कर हां जिवंत असल्याचा पुरावा आहे तर मग
'कृष्णाजी भास्कर यांनी महाराजांवर हल्ला केला आणि नंतर महाराजांनी त्यांना ठार केले'
फक्त वाईनामा सांगतो की कृष्णाजीस मारले.
आता हा एक पुरावा ग्राह्य धरावा की इतर पुरावे ग्राह्य धरावे याबाबत इतिहास संशोधकांनी आम्हास मार्गदर्शन करावे.
(हा मागोवा घेत असताना ऐतिहासिक साधनाचाच वापर केला आहे. तरी याविरोधात काही प्रवाद असल्यास ते पुराव्यांसहित मांडावेत.
बाजारगप्पा आणि कथा-कादंबरी यांना स्थान नाही.)
बहुत काय लिहणे!
मर्यादेयं विराजते!

Sunday, 7 February 2016

सामाजिक क्रांतिसाठी धर्म नष्ट करण्याची आवश्यकता नाही...!

सामाजिक क्रांतीसाठी किॅवा पुनरुत्थानासाठी किंवा समरसतेसाठी धर्म नष्ट करण्याची आवश्यकता नाही. धर्म हा हवाच हवा !

धर्मावर हल्ले चढवून किंवा त्यांची निॅदा करून किंवा तो नष्ट करण्याची भाषा करून सामाजिक पुनरुत्थान किॅवा समरसता किंवा एकात्मता किंवा समानता येईल असे आम्हांस तरी वाटत नाही. हिॅदुस्थानच्या स्वातंत्र्यचळवळीचा अभ्यास केला तर असे काही गट अभ्यासायला मिळतात की ज्यांना ह्या देशात आधी सामाजिक क्रांती व मग नंतर राजकीय स्वातंत्र्य हवे होते. दुसरा एखादा गट असा होता की ज्याला आधी राजकीय स्वातंत्र्य व मग नंतर सामाजिक क्रांती हवी होती. पण एक वर्ग व तोही अपवादत्मक असा होता की ज्याला ह्या दोन्ही गोष्टी साध्य करणे एकाच वेळी आवश्यक वाटत होते व त्यादृष्टीने तो तितका कृतीशील व यशस्वी वाटचाल करणाराही होता. अशांत हिंदुह्रदयसम्राट तात्याराव सावरकरांचं नाव आग्रहाने घ्यावं लागेल. कारणे खालीलप्रमाणे

"हिॅदुंचा हिॅदु राहूनच त्याची अस्पृश्यता गेली पाहिजे, हेच आमचे ध्येय आहे."

इति कृतिशील समाजोद्धारक हिॅदुह्रदयम्राट तात्याराव सावरकर

आता ज्या सावरकरांनी अस्पृश्योद्धाराचं एवढं अलौकिक कार्य रत्नागिरीत करून दाखविलं व तेही स्थानबद्धतेत असूनही, ते सावरकर आपल्या ह्या अस्पृश्यता चळवळीच्या हेतुबद्दल काय म्हणतात ते वर स्पष्ट केलंय. थोडक्यात म्हणजेच अस्पृश्योद्धारासाठी किॅवा सामाजिक पुनरुत्थानासाठी किॅवा समरसतेसाठी किॅवा सामाजिक क्रांतीसाठी हिॅदुधर्मास सतत शिव्या घालून व वेगळा धर्म निवडून जाण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही. व हेच त्यांच्या चळवळीचे व एकुणेक सामाजिक क्रांतीच्या योगदानाचे व श्रेष्ठतेचे व वेगळेपणाचे द्योतक आहे. जर ते तसे नसते तर महर्षी विठ्ठल रामजी शिॅदेंनी सावकरांच्या अस्पृश्योद्धारासंदर्भात खालील उद्गार का काढले असते?

१९३७ च्या मे महिन्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सावरकरांच्या सामाजिक क्रांतीबद्दल म्हणतात

"सामाजिक क्रांतीपुरतेच सावरकरांचे कार्य मर्यादित राहिले असते तर आणखी पाच वर्षांच्या आत सार्या हिॅदुस्थानमधून अस्पृश्यतेचे साफ उच्चाटण करून दाखवले असते. त्यांचं हे कार्य पाहून माझे ह्रदय भरून आले आहे. परमेश्वराने माझे अर्धे आयुष्य सावरकरांना ह्या कार्यासाठी द्यावे !"

इति महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


हेच उद्गार त्यांनी आंबेडकर किंवा शाहु महाराजांच्या सामाजिक क्रांतीबद्दलच्या चळवळीबद्दल का काढले नाहीत??? पाचच्या ठिकाणी दहा किंवा पंधरा वर्षे लागावीत पण त्यांना हे करून दाखविता आले असते, असे ते का म्हटेल नाहीत??? ते केवळ सावरकरांच्याच बाबतीत हे का म्हटले???

ही गोष्ट आम्हांस नक्कीच विचार करायला लावणारी आहे व सुज्ञांनी अगदी निरपेक्षपणे व डोळे सताड उघडे ठेऊन ह्याचा विचार करायला हवा.

थोडक्यात आम्हांला हेच सिद्ध करायचे आहे की अस्पृश्यता किॅवा तत्सम अनिष्ट चालीरीती किंवा विकृतींशी लढण्यासाठी स्वधर्मांवर म्हणजे हिॅदुधर्मावर शतघ्नी (तोफ) डागण्याची आवश्यकता सावरकरांना तरी त्याकाळी वाटली नाही व आजही जरी अस्पृश्यता वगैरे नसली तरीही इतर सामाजिक समरसतेसाठी आज धर्म नष्ट करण्याची आवश्यकता आहे असे आम्हांस तरी वाटत नाही.

अर्थात इथे एक मुद्दा आधीच स्पष्ट करणे आवश्यक आहे की ह्या लेखातून आम्ही शाहु-आंबेडकरांच्या चळवळीचा व त्यांच्या एकुणेक समाजोत्थानाच्या कार्याचा व त्यांनी तत्कालीन घेतलेल्या त्या अलौकिक अशा व्रताची कुठेही निंदा करत नाही आहोत किॅवा तिला दूषणे देऊन तिचे महत्व सावरकरांच्या सामाजिक क्रांतीशी तुलना करून कमी करण्याचा प्रयत्नही नाही करताहोत. आम्हांला केवळ हेच सिद्ध करायचं आहे की हिॅदुस्थानात तत्काळी किॅवा आजही सामाजिक पुनरुत्थानासाठी जी काही चळवळ किॅवा एकुणेक संघर्ष उभा करायचा आहे किॅवा त्याकाळीही झाला असेल तो धर्माची निॅदा करुन किॅवा त्याचा त्याग करुन करणे अभिप्रेत नाही. त्याकाळी जर तो तसा करण्याचा आंबेडकर प्रभृतींनी प्रयत्न केला असेल तर तो आम्हांस स्तुत्य वाटत नाही व आम्हांस हेही वाटते की त्यांचा तो तसा प्रयत्न त्यांच्या किॅचित अपयशास काही अंशी कारणीभूत आहे.

ह्यांस अपवाद फक्त शाहु महाराजांचा ! कारण त्यांनी जी काही सामाजिक क्रांती केली नि जो आदर्श उभारून दिला तो करत असताना त्यांनी हिॅदुधर्माची निॅदानालस्ती करण्याचा किॅवा तिचा त्याग करण्याचा कुठेही प्रयत्न केल्याचा दिसत नाही. उलट शाहु महाराज हे स्वत: कट्टर वेदानुयायी असल्याचे आपणांस त्यांच्या चरित्रावरून व पत्रव्यवहारातून स्पष्ट प्रतिपादन करता येते. ह्याबाबतीत पुरावाच द्यायचा म्हटला तर खालील देता येईल


राजर्षी शाहु छत्रपतींचे वैदिकधर्मावरचे प्रेम ! 👇

स्वत: शाहू छत्रपतींना वैदिक धर्म आणि स्थूल स्वरुपाची समाजरचना मान्य होती. त्यांचे एक पत्र यावर प्रकाश टाकते.

कोल्हापुरच्या विद्याविलासच्या संपादकांना लिहिलेले हे पत्र
(ता २३ मार्च १९२१)

"माझ्या मतासंबंधी बराच गैरसमज करण्यात येत आहे म्हणून माझे मत जनतेपुढे मांडण्याकरिता पाठवत आहे.

सत्यशोधक, समाजिस्टांचा हलल माझेवर का?

ज्याप्रमाणे ख्रिस्त ,बुद्ध, थिऑसफी इ. पंथांची काही तत्वे मला मान्य आहेत त्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची काहीतत्वे मला मान्य आहेत.

मी सत्यसमाजिस्ट कधीही नव्हतो व नाही.

हुबळीस ब्राह्मणेतर समाजाची बैठक झाली तेव्हा तेथील सत्यशोधक समाजाने मला पानसुपारीस बोलावले असता मी इतर संस्थांना जसा पाहुणा म्हणून तसा येईल असे सांगितले.

 मग मला सत्यशोधक का म्हणवले जाते?

मला वेद मान्य असून, मी वेदास चिकटून रहाणारा आहे असे असता माझ्यावर हल्ला का ?

कळावे,
शाहू छत्रपती मुंबई !"


पुढे जाऊन हेच शाहु छत्रपती वैदिक धर्माबद्दल म्हणतात की

"वैदिक धर्म विश्वव्यापी बनेल. ह्यादेशात भ्रातृभाव जागृत करणे हे आर्यांचे कर्तव्य आहे. देशाला जागृत करणारी रामबाण मात्रा वैदिक धर्मातच आहे.
कारण हिन्दूमात्राच्या अंत:करणात वेदाभिमान वसत आहे."

राजर्षी शाहु छत्रपतींचे चरित्र
धनंजय कीर - पृष्ठ क्रमांक ४५९

शाहु छत्रपतींना वैदिक धर्माबद्दल प्रचंड आस्था होती ! ते स्वत:ला कट्टर वैदिक म्हणवून घेत !

ते एकदा म्हणाले होते की

"मला जे काही शक्य झाले ते मी केले आहे. माझे जे कर्तव्य होते ते मी करून टाकले आहे. आता पुढील कर्तव्य सर्वस्वी तुमच्या हाती आहे. जर इतक्यावरही वैदिक धर्म प्रभावी झाला नाही तर आर्य प्रतिनिधी सभा व आपण हेच दोषी व्हाल"

पृष्ठ क्रमांक - ४५९ - राजर्षी शाहु छत्रपती - धनंजय कीर

ह्यावरून आमच्या म्हणण्याचा अर्थ वाचकांस लक्षात येईल.

थोडक्यात आम्हांस पुन्हा हेच सांगावेसे वाटते की सामाजिक पुनरुत्थानासाठी धर्म नष्ट करणे आवश्यक आहे असं ह्या शाहु छत्रपती व सावरकर प्रभृती दोन राष्ट्रपुरुषांस वाटत नाही हेच दिसते. ह्याबातीत आम्ही पुन्हा श्रीमद् स्वामी विवेकानंदांचाच सिद्धांत मांडतो म्हणजे आमच्या म्हणण्याचे मर्म वाचकांस लक्षात येईल

धर्म हीच भारतवर्षाची जीवनशक्ती - स्वामी विवेकानंद

धर्माला धक्का न पोहोचवता सर्वसामान्य जनतेची सर्वांगीण उन्नती - हे ध्येयवाक्य समोर ठेवा ! हिंदु समाजाच्या उन्नतीसाठी घर्म नष्ट करून टाकण्याची जरुरी नाही असे माझे ठाम मत आहे ! समाजाची सध्या जी अवस्था आहे ती धर्मामुळे आहे असं नव्हे तर सामाजिक व्यवहाराच्या बाबतीत ज्या तर्हने धर्माचा उपयोग करावयास हवा होता तसा तो केला गेला नाही म्हणूनच समाजाची आज अशी दशा झाली आहे ! जर धर्माला बाजुला सारून राजकारण, समाजकारण किंवा आणखी काहीतरी जीवनाचे केंद्र म्हणून किंवा राष्ट्राची जीवनशक्ती म्हणून स्वीकाराल तर याचा परिणाम हा होईल की तुमचा पूर्णपणे नाश होउन जाईल ! हा नाश जर टाळावयाचा असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट, तुमची जीवनशक्ती जो धर्म, त्याच्या आधारेच केली पाहिजे !
(माझा भारत, अमर भारत - पृष्ठ क्रमांक ३१-३२)


"हिंदुंनी धर्म सोडता कामा नये ! मात्र धर्माला त्याच्या योग्य सीमेत ठेवुनच स्वत:ची उन्नती करून घेण्यासाठी स्वतंत्रता दिली पाहिजे ! भारतातील सार्या समाजसुधारकांनी जर कोणती भयंकर चूक केली असेल तर ती ही की त्यांनी पुरोहितांच्या अघोरीपणासाठी व सामाजिक अवनतीसाठी धर्माला जबाबदार ठरविले आणि हिंदु धर्मरुपी अभेद्य किल्ल्यावर हल्ला चढवून तो उध्वस्त करून टाकण्याचा त्यांनी चंग बांधला आणि याचा परिणाम काय झाला? - हाच की त्यांना अपयश आले ! बुद्धदेवांपासुन तो राममोहन राॅय यांच्यापर्यंत सर्वांनी जातिभेदाला धर्माचे अंग मानण्याची चुक केली आणि जातिभेदाबरोबर धर्मावरही आघात केला. व्हायचे तेच झाले - त्यांना अपयश आले !
( माझा भारत, अमर भारत - पृष्ठ क्रमांक ३३


आज सामाजिक समरसता किॅवा पुनरुत्थानाचे आवाहन करणार्यांना हे विचार स्वीकारार्ह्य का वाटु नयेत???

आता आंबेडकरांचे धर्माबाबतचे विचार पाहु

आंबेडकरांनी जरी सुरुवातीस हिॅदुधर्मांवर प्रचंड निंदा करून त्याचा त्याग करून बौद्ध पंथाचा (धर्माचा नव्हे) जरी स्वीकार केला असला तरी त्यांनीही धर्माची आवश्यकता मानलेलीच आहे. म्हणजे त्यांनी जरी काही ठिकाणी सुरुवातीस हिॅदु धर्माची प्रखर व अकारण अशी निंदा केलेली असली तरीही ते धर्माची आवश्यकता नेहमीच अधोरेखित करतात हेही तितकंच महत्वाचे आहे.

थोडक्यात आजकाल जी निधर्मीपणाची जी काही बोंबाबोंब सुरु आहे ती ह्या तीन राष्ट्रपुरुषांस तरी मान्य होती असे त्यांच्या समग्र साहित्याच्या अभ्यासावरून तरी वाटत नाही. जर तसं असतं
त्यासंदर्भात विशेषत: आंबेडकरांचे खालील विचार पाहणे आवश्यक आहे.


आंबेडकरांना धर्म हवा होता ! त्यांची धर्म नष्ट करा अशी कुठेही धारणा नव्हती. बहिष्कृत भारत ह्या त्यांनी स्वत: सुरु केलेल्या वृत्तपत्रात ते म्हणतात.

"धारणात् धर्म इत्याहु: धर्मो धारयति प्रजा ही महाभारतकारांची व टिळकांची "प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाम् अनेकता उपास्यानाम् अनियम:" ही व्याख्यादेखील मला मान्य आहे. समाजाच्या धारणेकरिता घातलेली बंधने म्हणजे धर्म ही माझीदेखील कल्पना आहे."


पुढे तर ते अगदी स्पष्ट म्हणतात

"ख्रिस्ती व महंमद धर्माच्या सिद्धांतापेक्षा हिॅदु धर्माचा सिद्धांच कितीतरी पटीने समतेच्या तत्वाला पोषक आहे. माणसे ही ईश्वराची लेकरे, एवढ्यावरच न थांबता, ती ईश्वराचीच रुपे आहेत असे मोठ्या निर्भीडपणे हिॅदु धर्म सांगत आहे.
जेथे सारीच ईश्वराची रुपे आहेत तिथे कोणी उच्च कोणी नीच असा भेदभाव करणे शक्य नाही. हे त्या धर्माचे महान तत्व आहे, हे कोणासही नाकबूल करता यावयाचे नाही."

पुढे ते म्हणतात

"जेव्हा घर्माचे आचार त्या धर्माच्या विचारांशी विरोधी असतील तेव्हा तेव्हा धार्मिक आचारांमध्ये फेरबदल करून ते धर्माच्या तात्विक अंगांशी सुसंगत करून घेणे आवश्यक असते."


थोडक्यात, आंबेडकरांना पण हेच सुरुवातीस वाटत होते की धर्माचा त्याग न करताच त्यातील प्रथा किॅवा चालीरीतींत परिवर्तन करून समाजाची उन्नती साधावी. हे त्यांचं मत अगदी ग्राह्य वाटतं.

आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे पुढे झालेले त्यांचं बौद्ध धम्म (पंथ) स्वीकार व त्यामागची भूमिका

आंबेडकरांनी मी हिंदु म्हणुन जन्माला आलो तरी हिंदु म्हणुन मरणारा नाही अशी घोषणा केल्याने अनेकांना असं वाटतं की ते हिॅदुद्वेष्टे होते. पण ह्याबातीत त्यांचे चरित्रकार धनंजय कीरांचे वाक्य फार सुचक आहें. ते आंबेडकर चरित्रात स्पष्टपणे म्हणतात

की ही घोषणा करत असताना त्यांचा स्वर सद्गदित झाला होता व त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते.

म्हणजेच त्यांनी फार आनंदातिरेकाने किंवा फार द्वेषाने ही घोषणा केली होती असं निश्चितच नाही, हे धनंजय कीर देखील स्पष्टपणे उद्धृत करतात.

थोडक्यात केवळ नाईलाजास्तवच त्यांनी ही पंथांतराची घोषणा केली असावी असे आम्हांस वाटते. व त्यातूनही त्यांनी शेवटी बौद्ध का होईना पण हिॅदुधर्माचेच अपत्य असलेल्या पंथांचा स्वीकार करून शेवटी धर्मद्रोहीपणाचा किॅवा स्वत:स आजकालच्या फॅशनप्रमाणे निधर्मी दाखविण्याचा कुठेही अट्टाहास केला नाही हे स्पष्ट होते.


थोडक्यात आमचं सगळं म्हणणं आम्ही अगदी सोप्या भाषेत मांडतो

सेक्युलरिझमच्या नावाखाली निधर्मीपणा, सर्वधर्मसमभाव असले बाष्कळ शब्दप्रयोग करून जनतेला बावळट बनविण्यापेक्षा सामाजिक समरसता, समानता, एकता, आणायची असेल व समग्र हिंदु समाज एकसंघ टिकवायचा असेल तर त्यासाठी धर्म नष्ट करण्याची आवश्यकता नसून त्यातल्या अनिष्ट प्रथांना किंवा तत्सम चालीरीतींना फाटा देऊन कार्य करावे ही अपेक्षा आहे.


बहोत काय लिहिणे ! तुम्ही सुज्ञ असा !

इति तुकाराम चिॅचणीकर
पाखंड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Thursday, 4 February 2016

अखंड भारत – हिंदुराष्ट्र आणि वास्तव...!

१९४७ साली ब्रिटीशांच्या अन्यायकारी राज्यातून भारत स्वतंत्र झाला. याचवेळी अखंड भारत असावा अशी बहुसंख्य हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्तांची मागणी होती. परंतु भारत अखंड न राहता पाकिस्तान नावाचा नवीन अनैसर्गिक देश निर्माण करण्यात आला. नंतर १९४८ ला मोहनदास गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. कारण गांधींना फाळणीसाठी आणि हिंदूंच्या कत्तलीसाठी, ५५ कोटी पाकिस्तानला देणे यासाठी गोडसेंनी कारणीभूत मानले होते.
हिंदुत्ववादी संघटनांची अखंड भारत असावा ही तशी योग्य, न्याय्य आणि हक्काची मागणी होती. आजही केवळ पाकिस्तानच नव्हे तर अफगानिस्तानपासून ते ब्रह्मदेशपर्यंत आणि वर तिबेटपासून श्रीलंकेपर्यंत पुन्हा एकदा अखंड भारत व्हावं ही माझी इच्छा आहे. नव्हे ते ध्येय-लक्ष्य आहे. परंतु १९४७ सालचा विचार केला तर अखंड भारत देश आकाराला येऊ नये हेच सर्वथा योग्य आणि मुख्यतः हिंदूंच्या हिताचं होतं. ते कसे आणि का हे आपण पाहूया.
१.      फाळणीपूर्व भारत –
सप्तसिंधुपासून हिंदीमहासागरापर्यंत पसरलेला आपला हिंदुस्थान आणि आपला इतिहास अनेक परकीय आक्रमकांनी शेकडो वेळा लुटून नेल्याची आपल्याला माहिती आहेच. परंतु  बरेचसे परकीय आक्रमक लुट केल्यानंतर त्यांच्या त्यांच्या देशात पळून जाईपर्यंत हिंदूंनी त्यांना पराक्रमी प्रतिकार केला. परंतु १२ व्या शतकापासून सुरु झालेल्या मुस्लीम आक्रमणाला हिंदू समजा पूर्णतः थोपवू शकला नाही. ही आक्रमक मुस्लीम जमात येथेच बस्तान बसवून राहिली. याला काही फितूर हिंदू जबाबदार होतेच. मुस्लीम आक्रमक जेव्हा हिंदुस्थानात आले त्या वेळेपासून ते येथील राज्यकर्ते बनले. येथील मुलाच्या हिंदू राजांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण आपापसातील शत्रुत्वामुळे हिंदू राजे कधीही मुस्लीम आक्रमकांच्या विरुद्ध एक होऊ शकले नाहीत आणि यामुळेच हिंदुस्थानवर तब्बल ६०० वर्षे मुसलमानी सत्तेने राज्य केले.
अल्लाउद्दिन खिलजी, बाबर, अकबर, औरंगजेब अशा मुस्लीम सुलतान, बादशहांच्या कार्यकाळात त्यांनी हिंदूंचा कितीही छळ केला, अनन्वित अत्याचार केले, अन्याय केला, माता भगिनी बाटवल्या, मंदिरे लुटली तरीही हिंदू समाज कधीही एकजिनसीपणे याविरुद्ध पेटून उठला नाही, लढा देऊ शकला नाही. हिंदू या क्रूर सत्तेविरुद्ध कधीही एक झाला नाही.
या मुस्लीम सत्तेला वेगवेगळ्या ठिकाणी आव्हान दिले गेले. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याआधी विजयनगरचे राज्य ही त्याचीच उदाहरणे होत. पण हिंदू समाज याही थोर पुरुषांच्या आवाहनाने एक होऊ शकला नाही. त्यानंतर ब्रिटीशांच्या काळात तर हिंदू मुस्लीम संबंध कसे विकोपाला जातील याचीच दक्षता ब्रिटिशांनी घेतली. मुस्लीम समाज हा पूर्वीपासून राज्यकर्ती जमात असल्याने ब्रिटीशांच्या हाताखाली जगणे त्यांना असह्य होत असे.
फाळणीपूर्वीचा हिंदुस्थान हा असा होता.
२.      फाळणीची मागणी –
हिंदुस्थानी समाजाच्या मनात हा प्रश्न कायम पिंगा घालतो की देशाची फाळणी व्हावी ही मागणी खरेच कोणी केली.? कोणी जिना, मोहनदास गांधी, इक्बाल, सावरकर यांनी ही मागणी केल्याचे सांगतो. पण द्वीराष्ट्रवादाची संकल्पना सर्वप्रथम मांडली ती सर सय्यद यांनी. त्यांच्या मते हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यास लोकशाही देशात लोकसंख्येच्या आधारे हिंदू राज्यकर्ते बनतील. परंतु मुस्लीम आणि हिंदू दोहोंना ५०% राजकीय अधिकार असावेत अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर याच मागणीने दोन देश असावेत इथपर्यंत मजल मारली. मोहनदास गांधी आणि सावरकर दोघेही यावेळी बाल्यावस्थेत होते. म्हणजेच गांधींनी फाळणी मागितली नव्हतीच आणि सावरकरांनीही नाहीच. येथे एक सांगावेसे वाटते की लोकमान्य टिळक यांनी लखनौ करारात एका मुस्लिमाला ३ मते देण्याचा अधिकार मान्य केला होता.
३.      फाळणी आणि गांधी –
दुसऱ्या महायुद्धानंतर अपरिमित हानीमुळे ब्रिटिशांना आपल्या वसाहती सोडून जाण्यावाचून पर्याय नव्हताच. गांधी किंवा कॉंग्रेस भारतीय स्वातंत्र्याचे केवळ निमित्तमात्र होते. कारण यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळावयाचेच होते. गांधी शेवटपर्यंत म्हणत की फाळणी झाली तर माझ्या मृत्युनंतरच. परंतु मुस्लीम लीगपुढे त्यांचे काहीच चालले नाही. आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
४.      फाळणी आणि अखंड भारत –
फाळणी न होता अखंड भारतच असावा ही अनेकांची इच्छा होती आणि आजही आहे. परंतु या फाळणीमुळे हिंदू समाजाचा केवळ फायदा आणि फायदाच झाला आहे. कारण फाळणी न होता जर अखंड भारत झाला असतं तर काय झाले असते हे आधी समजावून घेऊया.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्रिटीशांच्या आधी ६०० वर्षे हिंदुस्थानावर मुस्लीम राजसत्ता होती आणि या काळात सर्वत्रच्या हिंदू समाजाने कधीही एक होऊन याविरुद्ध प्रतिकार केला नाही किंवा लढा दिला नाही. कितीही अत्याचार झाले तरी हिंदू समाज मुस्लीमांच्याच हाताखाली जगला. हे वास्तव आहे. फाळणीच्या वेळीही हिंदू समाजाला एका सूत्रात बांधून ठेवू शकणारे कोणतेही नेतृत्व हिंदूंकडे नव्हते. नेहरू किंवा कॉंग्रेस हिंदुहीतवादी कधीही नव्हतेच.
फाळणीवेळी  ३५ ते ४० % टक्के असणारा मुस्लीम समाज पाकिस्तानात ज्याला वाटेल तो याप्रमाणे निघून गेला आणि बाकीचा समाज येथेच राहिला. जर भारत अखंड राहिला असता तर... तर मुस्लीम समाज हा त्यांच्या धार्मिक अधिकारासाठी सदैव जागरूक असलेला समाज आहे आणि इस्लामी धर्मशास्त्राने जगाची विभागणी दार उल हर्ब आणि दार उल इस्लाम अशी आधीच करून टाकलेली आहे. मुस्लीम जमात आधीपासून आक्रमक असल्याने अखंड भारतावर जोर जबरदस्ती आणि जिहाद वगैरे नावाने याच जमातीने राज्य केले असते, कारण इतिहास याचा साक्षी आहे आणि वर्तमानात हिंदूंना कोणतेही नेतृत्व नव्हतेच. म्हणजेच अखंड भारत हा केवळ हिंदूंचा हिंदुस्थाना अथवा हिंदुराष्ट्र राहिलेच नसते. तर त्यात ती ३५ ते ४० % मुस्लीम लोकसंख्याही आली असती. आणि कदाचित मुस्लिमांच्या दयेवर हिंदूंना अपमानित जिणे जगावे लागले असते. पण फाळणी झाल्याने हिंदू समाज मुस्लीम आणि ब्रिटीश या दोन्ही अन्यायी सत्तेच्या जोखडातून कायमचा मुक्त झाला. ज्यामुळे आज पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्या शेकडो पटीने प्रगत म्हणून भारतीय समाजाचे आणि राष्ट्राचे नाव घेतले जाते. जर मुस्लीम समाज अखंड भारतात असता तर त्यांच्या देशांचे जे हाल आज सुरु आहेत, जसे की इतिहासकाळात भारतीयांचे केले तशाच प्रकारचे हाल देश अखंड राहिला असता तर हिंदू समाजाचे झाले असते.
५.      फाळणी आणि नथुराम गोडसे –
हिंदुराष्ट्रवादी तथा अखंड भारतवादी सर्वांचे प्रिय व्यक्तिमत्व म्हणजे नथुराम गोडसे. मोहनदास गांधी यांची हत्या-वध केला म्हणून पूजनीय आणि भारतमातेचा निस्सीम देशभक्त पुत्र म्हणून पूजनीय. नथुराम गोडसे सनातनी किंवा कट्टर हिंदू वगैरे नव्हताच, तर तो अतिरेकी देशभक्त होता. परंतु त्याचा हिंदू समाज, भारताचा इतिहास याविषयीचा अभ्यासही कच्चाच होता. अखंड भारत राहता त्या अखंड भारतात मुस्लीम समाजही येतो हे गोडसेंना माहित नव्हते काय.? आणि एकूणच हिंदू समाज हा मुस्लीम आक्रमक जमातीविरूद्ध कधीही एक झाला नाही हे गोडसेंना माहित नव्हते काय.? मग अखंड भारताने कोणाचा फायदा झाला असता.? पुन्हा एकदा हिंदू समाज मुस्लीम गुलामगिरीत लोटला गेला असता हे गोडसेंना माहित नव्हते काय.? की केवळ अतिरेकी देशभक्तीने अखंड भारताच्या फाळणीला गांधी जबाबदार असून केवळ त्यांची हत्या हाच एकमेव उपाय होता.? अखंड भारतात ३५ ते ४० % मुस्लीम लोकसंख्याही येते, केवळ जमीन नव्हे हे गोडसेंना माहित नव्हते काय.? आणि ही मुस्लीम लोकसंख्या जर अखंड भारतात समाविष्ट होती तर, मुस्लिमांच्या क्रूर आणि अन्यायी राजवटीला विरोध करण्याएवढे समर्थ नेतृत्व तेव्हा हिंदू समाजाकडे होते काय.? तर नाहीच, आजही नाहीच. मग देशाची फाळणी झाली त्यात हिंदूंचाच फायदा झाला असे मान्य करावेच लागते.
गांधी हत्येबाबत दिली जाणारी किंवा समर्थन करणारी जी करणे सांगितली जातात ती चुकीचीच होय, कारण गांधी हत्येचा प्रयत्न ५५ कोटी किंवा हिंदूंच्या कत्तली या आधीही झालेला होताच. तसेच गांधी हत्येमुळे देशभरात सुरु असलेल्या मुस्लीम विरोधी दंगली क्षणात थांबल्या, म्हणजे ज्यात हजारो मुस्लिमांची हत्या करता आली असती ते सर्व थांबले आणि दंगली या ब्राह्मणविरोधी सुरु झाल्या. गोडसेंना जर हत्या करायचीच होती तर त्यांनी पंडित नेहरूंची हत्या करायला हवी होती. कारण पंडित नेहरू हे मुस्लीम लांगुनचालन करणारे गृहस्थच देशाचे त्यावेळी नेतृत्व होते. म्हातारे गांधी नव्हे. जर नेहरूंची हत्या झाली असती तर कदाचित सरदार पटेल पंतप्रधान झाले असते, आणि त्या लोहपुरुषाने पाकिस्तानच्या प्रथम आक्रमणावेळीच पाकिस्तानचे निशाण मिटवून टाकले असते.
६.      आजचा भारत आणि हिंदुहित –
देशाची फाळणी झाल्याने आधी भारत आणि पाकिस्तान व नंतर बांग्लादेश या ३ देशांची निर्मिती झाली. ज्यामुळे भारतातील मुस्लीम लोकसंख्या टक्केवारीने झटकन कमी झाली. नवीन देशांपैकी पाकिस्तान जिहाद आणि अंतर्गत कलह, दहशतवाद यामुळे पोखरून निघाला आहे, तर बांगलादेशाची अवस्थाही तशीच आहे. यापैकी केवळ भारताने लक्षणीय प्रगती केली. आणि त्यामुळे पर्यायाने भारतातील हिंदूंची प्रगती झाली आणि हिंदूंचेच शासन देशात आले. फाळणीमुळे हिंदूंचे हित सध्या झाले. जुलमी मुस्लीम राजसत्ता आणि ब्रिटीशांच्या अन्यायातून हिंदूंना मुक्ती मिळाली.
वर अनेकदा मुस्लीम लोकसंख्येचा उल्लेख आला आहे, त्यातून हिंदू समाजाला भयभीत करण्याचा कोणताही उद्देश नसून केवळ वास्तवाचे आकलन व्हावे यासाठी त्याचा उल्लेख केला आहे. जे वास्तव ८०० वर्षापासून आहे तेच आजही आहे. आज भारतात हिंदूंचे राज्य असले तरी ते हिंदुहीतवादी नक्कीच नाहीये. आज कोणीही यावे आणि हिंदू धर्मावर टीका करावी असे सुरूच आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर लगेच राम मंदिर उभारायला सुरुवात करायला हवी होती, जर हिंदू एक असतं तर ते झाले असते. हिंदू एक असता तर काशी अन मथुरेतही भगवा ध्वज फडकला असता अन लाल किल्ल्यावरसुद्धा भगवा ध्वज फडकला असता. काश्मिरातून लाखो पंडितांना पलायन करावे लागले त्यावेळी सुद्धा बाकीचा हिंदू समाज निद्रित अवस्थेतच होता. आज मालेगाव, भिवंडी, हैदराबाद, मुंब्रा, मालदा, केरळ आणि किती किती ठिकाणी हिंदुंवर अत्याचार केले जातात, केले गेलेत, पण यावेळीसुद्धा हिंदू समाज चिरनिद्रेतून जागा झालाच नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझाल्याच थडग बांधलं तेव्हाही हिंदू समाज झोपलेलाच होता. आणि जर अखंड भारत असतं तर आज हिंदुन्ह्ची अवस्था दयनीय असली असती. कारण आज रा.स्व. संघ, भाजप, शिवसेना, विहिंप, बजरंग दल आणि कितीतरी हिंदू संघटना असूनही हिंदुंवर अत्याचार होताच आहेत. तेही बहुसंख्य हिंदू देशात असताना, मग मुस्लीम जर अखंड भारतासहित या देशात असते तर हिंदूंनी प्रतिकार किंवा अन्यायाला विरोध केला असता असे आपण म्हणून शकतो काय.? कारण वास्तव जे समोर दिसत आहे ते वर मांडलेच आहे.
७.      अखंड भारत आणि मी –
वरील लिखाणावरून कोणी असे समजू नये की मी अखंड भारत विरोधी आहे, तर नाही...कधीच नाही. मातेचे तुकडे झालेले मला नक्कीच पाहवत नाहीत. नव्हे पुन्हा एकदा अखंड भारत व्हावा अशीच माझीही इच्छा आहे. गांधी मला कधी प्रिय नव्हते किंवा अप्रियही नव्हते. गोडसेंची भावना योग्य होती. अखंड भारतमाता विखंड झाली हे पाहून अशी भावना निर्माण होणे यात गैर काहीच नाही. परंतु वास्तवाचे भान राखायला हवे. जर अखंड भारत निर्माण करावयाचा असेल तर तो अखंड भारत केवळ हिंदूंचाच असावयास हवा. १०० % हिंदू लोकसंख्या. तर आणि तरच अखंड भारताची उज्ज्वल प्रगती होऊ शकेल. कारण मुस्लीम लोकसंख्या जेव्हा कमी असते तेव्हा ते क्रूर न होता केवळ एक होऊन आपल्या मागण्या मान्य करायला लावतात आणि त्यांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा ते क्रूरपणे कोणत्याही पातळीवरचे अन्याय आणि अत्याचारी कृत्य करायला मागे पुढे पाहत नाहीत. आयसीस, सीरिया आणि आता जर्मनी किंवा युरोपीय देश त्याचे बोलके उदाहरण आहे, तर भारतात सुद्धा अजूनही सामान नागरी कायदा होऊ शकलेला नाही, की मुस्लिमांच्या कितीही बायका करणे आणि कितीही पोरांना जन्माला घालणे यावर कोणी बंदी आणलेली नाही. याला मुस्लीम लांगुलचलन असे म्हणा किंवा काहीही, पण ते वास्तव आहे. मुस्लीम जेव्हा बहुसंख्य असतात तेव्हा ते सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष असू शकत नाहीत आणि लोकशाहीवादीसुद्धा असू शकत नाहीत. हे इतिहास आणि वर्तमानकाळातले वास्तव आहे. पाकिस्तान किंवा बांग्लादेश आपण पाहताच आहोत. काही मुठभर मुसलम समाज चांगलं आहे, पण ते त्यांच्या समाजात सुधारणा व्हावी म्हणून कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे अखंड भारताचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येकाने हे ध्यानात घेतले पाहिजे की, अखंड भारत जर झाला असता तर तो ३५ ते ४०% मुस्लीम लोकसंख्येसह झाला असता, केवळ जमिनीसह नव्हे. अखंड भारतात एकही मुस्लीम नसावा असे कोणाचेही त्यावेळी मत निश्चितच नव्हते. आणि मुस्लिमांसह अखंड भारत झाला असता तर कदाचित मुस्लिमांच्या राजसत्तेखालीच पुन्हा एकदा हिंदूंना जगावे लागले असते. म्हणजेच फाळणी ही हिंदूंच्या हितासाठी योग्य घटना ठरली.

हिंदूंमध्ये असलेला नेतृत्वाचा अभाव यामुळे आजही हिंदू समाज वैफल्यग्रस्त आणि भीतीदायक अवस्थेत जगतोय. त्यामुळे जोपर्यंत कणखर हिंदू नेतृत्व तयार होत नाही तोपर्यंत अखंड भारत निर्माण होऊ शकत नव्हता आणी नाही. आजच्या बलाढ्य हिंदू संघटना काहीही करू शकत नाही, कारण त्यांच्या कार्यकर्त्यांची अथवा स्वयंसेवकांची हत्या झाली तरीही त्या संघटना केवळ नैसर्गिक आपत्तीत धावून जातात, हातातल्या काठीने अन्यायाविरुद्ध लढत तर नाहीच. केरळ आणि बंगाल त्याचे चांगले उदाहरण आहे. आणि हे असेच सुरु राहिले तर भारतमातेची अजूनही शकले पडायला वेळ लागणार नाही. केरळमध्ये स्वतंत्र राष्ट्राची मागणी काधीमध्ये डोके वर काढतच असते.