केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या गेल्या कित्येक वर्षांपासून केल्या जात आहेत. या घटनांच्या मागे असलेली पार्श्वभूमी, वैचारिक संघर्ष, राज्य सरकार आणि पोलिसांची भूमिका तसेच संघाचा या सर्व घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, या बाबी नागरिकांसमोर याव्यात म्हणून रा. स्व. संघाच्या राष्ट्रीय मीडिया टीमचे सह-समन्वयक जे. नंद कुमार यांची मुंबई तरुण भारतचे प्रतिनिधी 'महेश पुराणिक' यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.
केरळमध्ये सीपीएम-सीपीआय विरुद्ध रा. स्व. संघ हा संघर्ष जुना आहे, यामागची पार्श्वभूमी काय आहे?
संघ कार्यकर्त्यांवरील कम्युनिस्ट हिंसाचाराचा इतिहास १९६९ सालातील वडीकल रामकृष्णन या गरीब स्वयंसेवकाच्या हत्येपर्यंत मागे जातो. त्यानंतर केरळमध्ये आतापर्यंत मागील ५० वर्षांच्या काळामध्ये तब्बल २६७ पेक्षा अधिक संघ स्वयंसेवक आणि हितचिंतकांची हत्या करण्यात आली. यातील २३२ जणांची हत्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आली तर उर्वरित लोकांची हत्या कट्टर इस्लामी गटांनी केली. कन्नूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा घटना घडल्या, ज्यांची संख्या नेमकी सांगता येत नाही. जेवढ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली, त्याच्या सहापट अधिक लोक जखमी झाले. कन्नूरमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचे मुख्य कारण म्हणजे सीपीएमकार्यकर्त्यांचा संघ आणि अन्य राष्ट्रवादी संघटनांकडे वाढत चाललेला ओघ हेच आहे. आमचे कन्नूरमधील सर्वाधिक कार्यकर्ते हे प्रामुख्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला रामरामकरून आलेले आहेत. अन्य राजकीय किंवा अराजकीय घटकांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या वर्चस्ववादी धोरण आणि दहशतीपुढे लोटांगण घातले पण संघाने त्याला विरोध केला, याचमुळे संघ सीपीएमच्या रडारवर कायमअसतो. संघाचा पहिला बलिदानी रामकृष्णन याचा गुन्हा केवळ हाच होता की तो संघ कार्यकर्ता होता. मी येथे काही सुचवू इच्छित नाही पण सत्य हे आहे की, केरळचे सध्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन हे रामकृष्णनच्या खुनाच्या घटनेतील प्रमुख आरोपी होते. कन्नूरमधील हिंसाचाराचा हा इतिहास आहे.
गेल्या काही वर्षांत यामध्ये वाढ झाली आहे की, अशा घटना कमी झाल्या आहेत?
वडीकल रामकृष्णन यांच्या हत्येनंतर सीपीएमने हत्याकांडाची हीच पद्धत उचलली आणि इतरत्रही वापरली, जे नंतर कन्नूर मॉडेल या नावाने ओळखले गेले. त्यानंतर अशाप्रकारच्या हत्या आणि हिंसेला जणूकाही उधाणच आले, जे अजूनही सुरूच आहे. सीपीएमच्या म्होरक्यांचा हेच मॉडेल राज्याच्या अन्य भागातही राबविण्याचा प्रयत्न असतो. विशेषत्वाने आणीबाणीनंतर सीपीएमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात संघ आणि अन्य राष्ट्रवादी संघटनांमध्ये भरती झाले. याला सीपीएमचा आणीबाणीला असलेला निष्क्रिय पाठिंबा आणि संघाची लोकशाहीच्या पुनरुत्थानासाठी असलेली सक्रिय भूमिका कारणीभूत ठरली. आणीबाणीनंतरच्या काळात मात्र सीपीएमच्या संघ कार्यकर्त्यांवरील हल्ल्यात तीव्र वाढ झाली. सीपीएमराज्यात दर पाच वर्षांच्या फरकाने नेहमीच सत्तेत येत गेली. ज्या ज्या वेळी सीपीएमसत्तेवर आली त्या त्यावेळी त्यांनी राज्याची प्रशासकीय यंत्रणा आणि अधिकारातील लोक संघाला चिरडण्यासाठी वापरले. यात काही आश्चर्य नाही की, त्याच घटना आताही घडत आहेत. सीपीएमचे राज्य सचिव कोडियारी आणि कन्नूर जिल्ह्याचे सचिव पी. जयराजन या दोघांनीही राज्यात सत्ता आल्यानंतर संघ आणि भाजप विरोधात हिंसाचाराला दिवसाढवळ्या चिथावणी दिली. त्यानंतरच्या घटनांमधून हे सिद्ध झाले की, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गटाने पक्षाचा हुकूमअधिक जोमाने आणि अचूकपणे अमलात आणण्यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरी समाजाने या अशा पक्ष आणि सरकार प्रायोजित दहशतीविरोधात नक्कीच पुढे येण्याची आवश्यकता आहे.
ही वैचारिक लढाई आहे, असे तुम्हाला वाटते का?
रा. स्व. संघ भांडण-झगडा-संघर्ष आणि हिंसेवर विश्वास ठेवत नाही. आम्ही सर्वांच्या एकतेसाठी एकात्ममानव दर्शनावर विश्वास ठेवतो, ज्यात अन्य विचारधारांबाबत जरी भेदाभेद किंवा तणाव असला तरी सर्वांना समान स्थान असेल. संघर्ष आणि शस्त्रांसह झगडा हे कम्युनिस्ट विचारधारेसाठी अत्यावश्यक आहे. वैश्विकदृष्ट्या, हिंसा ही त्यांच्या पक्षाचा कार्यक्रमआणि धोरणच आहे. ते वर्ग-शत्रूवर विश्वास ठेवतात आणि त्याच्या समूळ नाशासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचा ज्यावर विश्वास आहे, त्याचीच ते अंमलबजावणी करतात. सीपीएमते कॉंग्रेस, आययुएमएल आणि एवढेच नव्हे तर त्यांच्या सरकारच्या आघाडीमधील भागीदार सीपीआय व एआयएसएफच्या कार्यकर्त्यांवर देखील शारीरिक हल्ले केले आहेत.
सीपीएमविरुद्ध रा. स्व. संघ याऐवजीही सीपीएमविरुद्ध अन्य सर्व अशी प्रचलित परिस्थिती आहे आणि जर तुम्ही इतिहासातून या घटनांचे अवलोकन केले तर आमचे सर्वाधिक बलिदानी कधी ना कधी सीपीएमकार्यकर्तेच असल्याचे दिसते. त्यामुळे हे नैसर्गिक आहे की, ते ज्या मतप्रणालीवर विश्वास ठेवत होते त्याचेच प्रतिबिंब पडले.
डावी विचारसरणी तथा त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे, या हत्या डाव्यांच्या निराशेचे द्योतक आहेत का?
हे खरे आहे की, डाव्या विचारसरणीच्या प्रभावात सर्वत्र मोठ्या प्रमाणात घट होत आहे. जागतिक परिस्थितीचा विचार करता आणि भारताचा राजकीय इतिहास पाहता दोघेही याच गोष्टीची साक्ष देतात पण आपण इतरत्र पाहिले आहे की, कम्युनिस्ट पक्ष अथवा कार्यकर्ते त्यांच्या विचारधारेच्या अस्तित्वासाठीचा शेवटचा संघर्ष करताना अत्यंत निर्दयी हिंसाचार आणि दहशतीचा नेहमीच अवलंब करतात. याच गोष्टी आपण सध्या केरळमध्ये पाहत आहोत.
रा. स्व. संघाचा विस्तार संपूर्ण देशात होत आहे पण, तुम्ही केरळसारखी परिस्थिती मात्र इतरत्र कोठेही पाहिली नसेल. याचा अर्थ असा नव्हे की, रा. स्व. संघाच्या विचारधारेचे विरोधक देशाच्या अन्य भागात नाहीत! हो, ते आहेतच. पण रा. स्व. संघाने अन्य प्रदेशात आपले स्थान बळकट करण्यासाठी आपल्या वैचारिक विरोधकांच्या विरुद्ध कधीही हिंसेचा वापर केलेला नाही. मात्र, तुम्ही केरळमधील सर्वच राजकीय हिंसाचाराच्या घटनांचा अभ्यास केल्यास दुसर्याक टोकाला संघ अथवा अन्य कोणीही असो, एका टोकाला नेहमी सीपीएमआणि त्यांचे कार्यकर्ते असल्याचेच स्पष्ट होते. फॅसिस्ट आणि एकपक्षीय विचारधारा असल्याने कम्युनिस्ट पक्ष नेहमीच राष्ट्रवाद्यांच्या विरोधात असहिष्णु असल्याचेच दिसते.
कम्युनिस्टांनी केलेले हल्ले अत्यंत पाशवी असून ते त्यात स्त्रिया किंवा लहान मुलांनाही सोडत नाहीत. आपण याबद्दल काय विचार करता?
सीपीएमत्यांच्या हिंसक विचारांचा प्रचार-प्रसार करताना कोणताही भेदभाव बाळगत नाही. म्हणजे हिंसक हल्ले करताना ते पुरुष, स्त्रिया आणि बालके यांच्यात कोणताही फरक करत नाहीत. जसे मी आधी सांगितले, तशी ही परिस्थिती कम्युनिस्ट विरुद्ध इतर सर्व अशीच आहे. कम्युनिस्टांनी केवळ आमच्या कार्यकर्त्यांवरच नव्हे तर त्यांच्या घरातील स्त्रिया आणि मुलांवरही हिंसक हल्ले केले. एवढेच नव्हे तर त्यांनी माणसांचे गळे कापलेच पण त्यांच्या पाळीव प्राण्यांचीही हत्या केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेल्याच आठवड्यात केरळमधील पलक्कड येथे एका ७ वर्षीय मुलावरही वारंवार हल्ले केले, त्याच्या कुटुंबीयांना जाळून टाकण्याचा प्रकार घडला, ज्याचे कुटुंबीय भाजपशी संबंधित होते, यावेळी त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्ते राधाकृष्णजी यांनाही आगीमुळे गंभीर इजा झाली. तसेच या घटनेतील इतर सर्व अजूनही अत्यवस्थ आहेत. हे अत्यंत निराशाजनक आहे की, कोणत्याही राष्ट्रीय माध्यमांनी याची दखल घेतली नाही. मलप्पुरमया मुस्लीमबहुल जिल्ह्यातील दुसर्याण एका क्रूर घटनेत, भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या १० महिन्यांच्या बाळाला सीपीएमच्या गुंडांनी रस्त्यावर फेकून दिले. मी तर म्हणेन की, ही हिंसक कृत्ये केवळ मार्क्सवाद्यांच्या विफलतेचीच निदर्शक आहेत. अशी तिरस्करणीय कृत्ये करणार्यांनना खरे तर केवळ बालकभक्षी-नरभक्षी असेच म्हटले जाऊ शकते.
रा. स्व. संघाचा सर्वच हत्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे?
केरळमधील हिंसाचार हा सर्वस्वी कम्युनिस्ट पक्षानेच सुरु केलेला आहे, यात तिळमात्रही शंका नाही. राज्यात रा. स्व. संघ आणि इतर नॉन कम्युनिस्ट गटांवर अनेकदा एकतर्फी हल्ले करण्यात आले. यावर एकमेव उपाय म्हणजे, सीपीएमने हिंसेचा मार्ग सोडावा आणि संघाबरोबर शांततेसाठी पुढाकार घ्यावा. एकदा, सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केरळला भेट दिली होती. माध्यमांपुढे क्वचितचे येणारे मोहनजी त्या दिवशी विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोकजी सिंघल यांच्या निधनानंतर श्रद्धांजलीपर मनोगतासाठी कन्नुरमध्ये माध्यमांसमोर आले. जेव्हा कन्नुरमधील राजकीय हिंसाचाराविषयी त्यांना प्रश्न विचारला गेला, ’’तेव्हा ते म्हणाले की, आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षापुढे शांततेसाठी हात पुढे केला आहे.’’ तुम्ही कल्पना करु शकता? की रा. स्व. संघाची सर्वोच्च पदावरील व्यक्ती ही बाब सांगत आहे. मोहनजी असे म्हणाले कारण त्यांना माहिती आहे की, येथील परिस्थिती किती गंभीर आहे ते. पण विद्यमान मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी मात्र त्याच जुन्या मुजोर पद्धतीने उत्तर दिले की, ’’मोहन भागवत यांची इच्छा असेल तर सर्व हिंसाचाराचा शेवट होईल.’’
साप्ताहिक केसरीच्या संपादकाच्या नात्याने आमच्या संघटनेच्या वरिष्ठांशी कोणतीही चर्चा न करता आम्ही हिंसाचाराच्या समाप्तीसाठी आवाहन करणारा एक लेख प्रकाशित केला. मी यामध्ये इतिहासातील घटनांचे कोणतेही छिद्रान्वेषण न करता किंवा हे सर्व कोणी सुरु केले याचा कोणावरही आरोप न करता अथवा कोणाच्या किती कार्यकर्त्यांची हत्या झाली हे न मांडता, सकारात्मक भूमिका घेतली तसेच याच लेखातून हिंसेच्या समाप्तीसाठी तातडीचे आवाहन केले. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची यावरील प्रतिक्रिया फारच निराशाजनक आणि शांततेच्या आवाहनाची थट्टा करणारी होती. असे असले तरी रा. स्व. संघ मात्र नेहमीच शांततेच्या बाजूने उभा राहिल, हे नक्की.
दिल्लीमध्ये सध्या संघ विचारांचे सरकार सत्तेवर आहे, तर या विरोधात सरकारने काही हस्तक्षेप केला आहे का? आणि जर तसे नसेल तर, भविष्यात न्याय मागण्यासाठी काही योजना आहेत का?
आम्ही न्यायासाठी गेल्या अर्धशतकापासून अथक प्रयत्न करीत आहोत. रा. स्व. संघ-भाजप आणि अन्य राष्ट्रवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे केरळमध्ये गेली अनेक दशके घटनात्मक अधिकार नाकारण्यात आले. आम्ही कायदा आणि घटनेच्या कार्यकक्षेत राहून जे काही शक्य होईल त्या सर्व कायमस्वरूपी आणि पर्यायी उपायांच्या शोधात आहोत. राज्य सरकारवर मात्र आमचा काहीही विश्वास नाही, कारण त्यांनी या प्रायोजित दहशतवादाच्या प्रसारासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. केंद्र सरकारव्यतिरिक्त देशाच्या अन्य भागांत जे घटक मानवाधिकाराच्या हननानंतर पालकत्वाची भूमिका घेतात, अशा मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि नागरिकांनी मात्र जेथे एका व्यक्तीवर हत्येचा आरोप ठेवला जाऊ शकत नाही, अशा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या हिडीस आणि अमानुष कृत्यांमागील पाशवी चेहरा उघडा पाडण्यासाठी पुढे आले पाहिजे.
पोलीस आणि न्यायपालिका या विषयांकडे कशाप्रकारे पाहते?
आमची न्यायपालिकेवर पूर्ण श्रद्धा आहे. मतभेद असले तरी आम्ही न्यायपालिका राजकारणापासून स्वतंत्र आहे, यावर विश्वास ठेवतो. आम्ही आमचे मूलभूत आणि घटनात्मक अधिकार पुन्हा प्राप्त करू इच्छितो. भारतीय संविधानानेच स्वातंत्र्याची आणि सांस्कृतिक हक्काची हमी दिलेली आहे. असे असले तरी, कन्नूरमधील राजकारणाचा विचार करता, केरळ पोलिसांनाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भीती वाटते आणि त्यामुळेच ते या दर पाच वर्षांनी सत्तेत येणार्याक खुनशी पक्षाशी दोन हात करण्यास उत्सुक नसतात. तसेच पोलीस यंत्रणेतही सीपीएमचे कार्यकर्ते पसरलेले आहेत. उलट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते एखाद्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात गेले तर त्यांना येथे व्हीआयपी वागणूक दिली जाते. विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यातील प्रमुख पुढारीही कन्नूर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या ब्लॉक-आठमध्ये पूर्वीपासून जे सीपीएमचे कार्यकर्ते आहेत आणि गुन्हेगार म्हणून कैदेत आहेत, त्यांच्या भेटीसाठी आले. सीपीएमच्या गुन्हेगारांना एलडीएफच्या राजवटीत गुन्ह्यांतून मुक्त करण्यात आले. कॉंग्रेस पक्षाचीदेखील सीपीएमच्या या कृत्यांना मूक संमती आहे, कारण दोघेही भाजपला आपला मुख्य शत्रू समजतात. तर पोलीस संघ स्वयंसेवकांना बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबतात आणि सीपीएमला अनुकूल अशा साक्षी-पुरावे द्यायला भाग पाडतात. नजीकच्या भूतकाळात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात पोलिसांनी स्वयंसेवकांचा क्रूरपणे छळ केला आणि नंतर त्याच पोलिसांना निष्पाप घोषित केले गेले. अशी ही तेथील प्रचलित परिस्थिती आहे, अशावेळी आम्ही पोलिसांकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?
गेल्या काही दिवसांत केरळमधील अनेक युवकांनी इसिसमध्ये प्रवेश केला आहे. यामागे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हात असू शकेल का?
युवकांच्या इसिसमधील प्रवेशाच्या वाढत्या घटनांकडे खरे तर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे. केरळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विचारांचे सरकार नसल्याने दहशतवादी संघटनांच्या प्रचारासाठी हे राज्य सुपीक जमीन असल्यासारखेच झाले आहे. आता तर, केरळमध्ये विशेषत्वाने सीपीएमची सत्ता आल्यानंतर अनेक घटनांमध्ये दहशतवादाचा संबंध असल्याचे नोंदले गेले आहे. येथे मुस्लीमयुवकांच्या मनात कट्टर-धर्मांधतेची बीजे सर्रास रोवली जात आहेत. इंग्लंडमधील दैनिक ’द गार्डियन’ने यासंदर्भात एक लेख प्रकाशित केला होता, इसिसमध्ये भरती करणार्यां ना केरळची भूमी सुपीक का आहे? (How Isis recruiters found fertile ground in Kerala?) या नावाने. इस्लामी अतिरेकवादाची येथे जोमदार वाढ होते आहे, त्यामुळे कित्येक आंतरराष्ट्रीय माध्यमांनीदेखील आपले लक्ष केरळकडे वळवले आहे. कित्येक इस्लामी संस्था आणि संघटनांनी सलाफी विचारसरणीच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य सरकार व कॉंग्रेस आणि मुस्लीमलीगसारख्या राजकीय पक्षांशी संगनमत केले आहे. सलाफी विचारसरणीच्या संस्था भूछत्रासारख्या चौकाचौकात आणि नाक्यानाक्यांवर उगवल्या आहेत. आता हे सिद्ध झाले आहे की, हे छोटे राज्य कितीतरी दहशतवाद्यांच्या इसिसमध्ये भरतीसाठी कारणीभूत ठरले आहे. पण अजूनही राज्य सरकारने या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि हा धोका कमी करण्यासाठी कोणतीही कारवाई न करता, अशा संस्था अथवा लोकांवर मेहेरनजरच केली. राज्य सरकार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या जहालमतवादी घटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि आपली कट्टर धर्मांध इस्लामी मतपेटी जपण्यासाठी रा. स्व. संघासारख्या राष्ट्रवादी संघटनांना लक्ष्य केले. रा. स्व. संघावर कम्युनिस्टांकडून होणार्याे हल्ल्यांमागे हे एक मुख्य कारण आहे की, त्यांचा मतदार हा मोठ्या प्रमाणात एकगठ्ठा असलेला मुस्लीम समाज आहे. सीपीएमद्वारे संघावर केलेल्या हल्ल्यांचा बडेजाव करण्यासाठी आणि मूलतत्त्ववाद्यांची मते मिळविण्यासाठी सार्वजनिकपणे बीफ फेस्टिव्हलसारख्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. याची माहिती आधीही देण्यात आली होती की, येथे लाल-जिहादी त्रिकूट कार्यरत आहे. देशभरातील राष्ट्रविरोधी आणि जनविरोधी अनेक घटनांमध्ये त्यांचा हात असल्याचेही याआधी स्पष्ट झाले आहे.
- महेश पुराणिक







