Sunday, 24 April 2016

हिंदुत्वाच्या स्वाभिमानाचे स्फुल्लिंग

हिंदू समाजात हिंदुत्वाचा स्वाभिमान निर्माण होऊ नये यासाठी गेल्या 50 हुन अधिक वर्षापासून पद्धतशीर प्रयत्न सुरु आहेत. याचसाठी हिंदु बांधवांमध्ये अपराधीपणाची भावना (गिल्टी फीलिंग) न्यूनगंड तयार करून त्यांना स्वाभिमानी न होऊ देण्यासाठी किंवा बैकफुट वर ठेवण्यासाठी धर्मद्रोही फेक्युलर किंवा फुरोगामी लोक्स विविध मार्गांचा वापर करत आहेत/असतात. यातील महत्वाचा मार्ग म्हणजे किरकोळ घटनांना जास्तीत जास्त महत्व देऊन त्याद्वारे हिंदू धर्म आणि समाज किती असहिष्णू अथवा वाईट आहे हे ठरवण्याचा प्रयत्न करणे. अगदी अलीकडील काही घटना वा उदाहरणे पाहिलीत तरी ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येईल. जवखेडा, दादरी किंवा तृप्ती प्रकरण असो. जवखेड्यातील घटना ही सवर्ण हिंदूंनी केलेली कृती असे ठरवून काही तथाकथित लोकांनी हिंदूंना दोष देण्यास सुरुवात केली, पण चौकशी अंती ते कौटुंबिक प्रकरण होते हे निष्पन्न झाले. त्यानंतर दादरी प्रकरणी सुद्धा उत्तर प्रदेश सरकारने तपास कामात हस्तक्षेप केला. परंतु अखलाख च्या घरी असलेले मांस हे गोमांस असल्याचे नंतर उघड झाले. तसेच तृप्ती देसाई प्रकरण, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसेल. पण, त्यावरून मोठे काहूर माजवले गेले आणि धर्माला शिव्या द्यायला सुरुवात केली, इतर लोकांनी. मात्र, हिंदू धर्मात आज घडीला स्त्रियांना जेवढे स्वातंत्र्य आहे तेवढे दुसऱ्या धर्मात खचितच असेल. तरीही यात हिंदूंना वाईट ठरवण्याचे प्रकार सुरूच आहेत. काल परवा जळगावात झालेली घटना देखील तशीच. क्रियेला प्रतिक्रिया तशी ही घटना झाली, पण कित्येक लोकांनी लगेच धर्मांध शक्ती वगैरे म्हणत हिंदूंना दोष देण्यास सुरवात केली.
वरील सर्व घटना या अलीकडच्या काळातील आहेत, याआधीही असे प्रकार वर्षानुवर्षे होत आलेत. मग ते काही संघटनांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न असोत किंवा माध्यमांनी केलेले प्रयत्न असोत, प्रत्येकवेळी हिंदू समाज अथवा धर्म किती नालायक आहे, हेच पाखंड सिद्ध करण्याची या लोकांची अहमहमिका चालू असते. या सर्वांचा परिणाम असा होतो की, कित्येक हिंदू ह्या लोकांच्या गोबेल्स नितीला बळी पडतात आणि धर्मविरोधक होऊन धर्मद्रोह्यांच्या कळपात सामील होतात. त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होऊन हिंदू असण्याचा न्यूनगंड तयार होतो. आणि हेच धर्मद्रोह्यांना हवे असते. परंतु आता हिंदूंनी ह्या लोकांच्या दुष्ट आणि धर्माला नष्ट करण्याच्या सुप्त हेतूलाओळखून याविरोधात संघटितपणे पुढे यायला हसे. तसेच, या लोकांचे मुद्दे खोदून काढायला हवेत.
अशा लोकांत सध्या बीग्रेडी, बामसेफी आणि कान्हूलाल सारखी पिलावळ जास्त पुढे आहे, तरी ह्यांना विरोध करायलाच हवा आणि हिंदुत्वाच्या स्वाभिमानाचे स्फुल्लिंग प्रत्येक हिंदुमनात प्रज्वलित करायलाच हवे.
- महेश पुराणिक

No comments:

Post a Comment