Sunday, 27 November 2016

कॅशलेस होणे सोपे

दि. २८ नोव्हेंबरच्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा वेध...!
***

कॅशलेस होणे सोपे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यास्वच्छ भारत मोहिमेला म्हणजेच काळ्या पैशाविरुद्धच्या लढ्याला देशभरातील करंट्यांनी सामान्य जनतेचा कळवळा आल्याचे दाखवत विरोध केला. त्याचीच पुढची लंगडी उडी म्हणजे याच टाळूवरचे लोणी खाणार्या लोकांनीभारत बंदचे आवाहन केले. परंतु, संपूर्ण भारतात सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, विविध सर्वेक्षणे, समाजमाध्यमातील नेटकरी या सर्वांकडून नोटाबंदीला समर्थन मिळत असल्याने हा बंद फुसका बारच ठरेल, यात तीळमात्र शंका नाही. पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचा एक फार मोठा परिणाममात्र आता सगळीकडेच दिसत असून रोख व्यवहारांऐवजी कॅशलेस होण्याकडे सर्वांचा कल वाढत आहे. ’’जसे व्हॉटसऍप वापरायला शिकलात तसेच कॅशलेस व्यवहारही शिका,’’ असे आवाहन मोदींने केले होते. याचाच प्रत्यय आता आपल्याला केवळ मोठ्या शहरातच नव्हे तर छोट्या गावातही येत आहे. देशातील छोटे राज्य असलेले गोवा ३१ डिसेंबरअखेर पूर्णपणे कॅशलेस होईल, असा दावाही राज्याच्या मुख्य सचिवांकडून करण्यात आला तर रायगडमधील धसई गावदेखील पूर्णपणे कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने मोठी झेप घेत आहे. त्याचप्रमाणे नागपूर, लखनऊ, अहमदाबाद, दिल्लीसह इतरत्र चहा टपरी, पानटपरी आदी छोट्या दुकानात, भाजीविक्रेते, मांसविक्रेते, किराणा दुकान, दुधविक्रेते सर्वच ठिकाणी कार्ड स्वाईप मशीन, मोबाईल बँकिंग, मोबाईल वॉलेट याचा वापर करीत आहेत. यामुळे डिजिटल इकॉनॉमी ही संकल्पना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्याचवेळी आपल्या पैशाची रद्दी झालेल्या विरोधकांचे मतलबी राजकारण एका बाजूला तर एका चहाविक्रेता पंतप्रधानाचे डिजिटल भारताचे ध्येय दुसर्या बाजूला अशी परिस्थिती देशात निर्माण झालेली दिसते. तसेच एका आयआयटी उत्तीर्ण व्यक्तीच्या विरोधी मर्कटलीलांनी जनतेला विदूषकी आनंदही मिळत आहे. मात्र, देशाला जगाच्या बरोबरीत किंवा त्यापुढेही घेऊन जायचे असेल तर डिजिटल इकॉनॉमीचा स्वीकार करावाच लागेल, हे सत्य जेवढ्या लवकर विरोधकांना समजेल तेवढे उत्तम! शेवटी देशहिताच्या आड येणार्या लोकांनी हेकेखोरपणे ठरविलेल्याबंदला प्रतिसाद देण्याचा छंद ठेवायला,आम्ही सामान्य असलो तरीबेबंदनाही हे दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे, त्यामुळे सर्वांनीच पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा, प्रतिसाद देत डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ठरते.
***
फायदा सर्वांना

कॅलेस व्यवहाराचा मुद्दा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्यामन की बातया कार्यक्रमातही मांडला. यावेळी त्यांनी याची सांगड डिजिटल इंडियाशी घातली. कॅशलेस होण्यात सध्या तरुणाई आणि शहरी जनता आघाडीवर असली तरी यात ज्येष्ठ आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यावरही भर द्यायला हवा. आज मोबाईल प्रत्येकाकडे आहे. इंटरनेट, वायफाय या सुविधाही उपलब्ध आहेत, पण त्यातील वॉलेट, नेटबँकिंग, आयएमपीएस, एनईएफटी, युपीआय या विविध पर्यायांची ओळख ज्यांना या गोष्टींची माहिती नाही, अशा आपल्या ओळखीतल्या, शेजार्यांना, व्यावसायिकांना करुन देणेही अत्यावश्यक आहे. तसेच याव्यतिरिक्त आणखी सोपी प्रणाली निर्माण करणेही गरजेचे आहे. याबाबत भाजपशासित गोवा राज्याचे उदाहरण पुरेसे ठरेल. गोव्यात कोणत्याही नागरिकाने आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी मोबाईलवरून केवळ *९९# हा क्रमांक फिरवला की कॅशलेस बँकिंगचे पर्याय येतात आणि व्यवहार सुरू होतात. यातील महत्त्वाची बाब म्हणजे याचा वापर करण्यासाठी स्मार्टफोन असण्याचे बंधन नाही, म्हणजेच फिचर फोनवरूनही असे व्यवहार करण्याची सुविधा यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सोप्या पर्यायामुळे ज्यांना स्मार्टफोन वापरणे शक्य नाही तेसुद्धा कॅशलेस व्यवहार करू शकणार आहेत.
भारताची अजूनही निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे शेतकर्यांना बी-बियाणे, खते यांची खरेदी आणि त्यानंतर तयार माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या, तेथील हमाल, आडते, ग्रामीण भागातील आठवडी बाजार या ठिकाणी कॅशलेस व्यवहार होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतल्यास शेतकरीही या व्यवस्थेशी मोठ्या प्रमाणात जोडला जाईल.    
कॅशलेस व्यवस्थेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणत्याही व्यवहारांच्या पाऊलखुणा निर्माण होतील, बँकांमध्ये सर्व नोंदी ठेवल्या जातील ज्यातून नागरिकांचे सरासरी उत्पन्न किती हे समजेल. यातून करप्रणाली आणखी बळकट होईल. अधिकाधिक नागरिक कररचनेत येतील. यातून सरकारचे उत्पन्न वाढल्याने विधायक कामांना अधिक पैसा उपलब्ध होईल. देशात सध्या केवळ साडेचार टक्के जनता कर भरते त्यामुळे करांची टक्केवारी किंवा ज्याला करांचे ओझे म्हटले जाते ते जास्त आहे, परंतु अधिकाधिक नागरिक जसे यात सहभागी होतील तसे कर जास्त जमा झाल्याने कदाचित करांची टक्केवारीही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहार हे उपयुक्त आहेत. बाकी विरोधकांनी कितीही शिमगा केला तरी त्यांच्या उलट्या बोंबांकडे लक्ष न दिलेलेच बरे.

- महेश पुराणिक

No comments:

Post a Comment