================================
सध्या आधुनिक म्हणवनार्या व्यक्तींकडून एक लोभस पोस्ट फिरवली जातेय. गणेशउत्सव हा एक "ब्राह्मणी कावा" आहे. ब्राह्मणांचे पोट भरावे, म्हणून हे सारे थाट
रचले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ह्या काव्याला बळी पडू नये.. आणि बरेच काही. ते त्यांच्या एकाकी आणि द्वेषी वृत्तीने विचार करतात आणि अविचारानांना आधुनिक विचारांच लेबल लावून त्याला "पुरोगामी" अस गोंडस नाव देतात, व ते अविचार बाजारात खपवायला निघतात. मनातला द्वेष, ब्राह्मणविरोधी वृत्ती ह्या गोष्टीमुळे कुठलाही विषय त्रयस्थ भूमिकेतून हातळणे त्यांना जमत नसावं किंवा असे विचार मांडून चारचौघात त्यांच्या तथाकथित ढोंगी आधुनिकतेची वाहवा होत असेल, म्हणून ते कुठलाही विषय "ब्राह्मण" ह्या विषया भोवती ओढून आणत असावे.
रचले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ह्या काव्याला बळी पडू नये.. आणि बरेच काही. ते त्यांच्या एकाकी आणि द्वेषी वृत्तीने विचार करतात आणि अविचारानांना आधुनिक विचारांच लेबल लावून त्याला "पुरोगामी" अस गोंडस नाव देतात, व ते अविचार बाजारात खपवायला निघतात. मनातला द्वेष, ब्राह्मणविरोधी वृत्ती ह्या गोष्टीमुळे कुठलाही विषय त्रयस्थ भूमिकेतून हातळणे त्यांना जमत नसावं किंवा असे विचार मांडून चारचौघात त्यांच्या तथाकथित ढोंगी आधुनिकतेची वाहवा होत असेल, म्हणून ते कुठलाही विषय "ब्राह्मण" ह्या विषया भोवती ओढून आणत असावे.
महाराष्ट्र हा तसा आधुनिक राज्यांच्या गणणेत येणारा आहे. ही आधुनिक मंडळी "३१ डिसेंबर, गटारी" हे सण म्हणजे लोकांचे 'सांविधानिक हक्क' असल्या सारखे बोंबलतात. ३१ डिसेंबर च्या पार्ट्यासाठी मद्य, मांसाहार ह्या गोष्टींसाठी हॉटेल, बार ह्यांना खास रात्री उशिरा पर्यंत सेवा देण्याची परवानगी मिळते. तेव्हा हे "31st" सारखे अर्थ नसलेले सण म्हणजे हॉटेल, बार मालकांचे पैसे कमवण्याचे धंदे असून, ते बंद व्हावेत अस म्हणणारा कोणी पुरोगामी माझ्या काही पाहण्यात नाही. वाढदिवसाला हॉटेलातली पार्टी, केक ह्या गोष्टी देखील "हॉटेली कावा" आहे, त्याला बळी पडू नये असे देखील कोणी पुरोगामी म्हणतांना कधी दिसला नाही. त्या वेळेस त्या खर्चापेक्षा त्यांचा आनंद अधिक मोलाचा ह्यांना वाटतो, मग आमच्या उत्सवातल्या आनंदाच, उत्सवाच, आमच्या पवित्र भावनांच काय ? ते ब्राह्मणी कावे कसे ठरतात ?
दुसरी बाजू म्हणजे, कुठल्याही पुरोहिताकडून गणपती बसवायलाच हवा अस काही बंधन नाही, किंवा गणपती न बसवल्यास फाशी, जन्मठेप आहे असा देखील फतवा काढण्याची हुकुमी पद्धत आमच्या धर्मात नाही. गणपती आणून प्राणप्रतिष्ठापनेचा विधी न करताच, त्याला आपल मानून पूजन करणारे देखील अनेक आहेत. आम्हाला गणपती बसवायला वेळ नाही, सवड नाही किंवा ते पटत नाही अस म्हणर्याना संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग तरी देखील हा ब्राह्माणांचा पोट भरण्यासाठीचा बामणी कावा कसा ठरतो ?
मूळत: कोण, कश्यामुळे कमावतो हा प्रश्नच उत्सवांच्या बाबतीत उपस्थित करणच चुकीच आहे. कुठलाही उत्सव, सण हा सगळ्यांनी एक यावं, एकामेकाची दुखे-सुखे वाटून घ्यावीत, आनंद, जल्लोष साजरा करावा ह्याच उद्देशाने केला जातो. कोण कसा कमवतोय ह्या पेक्षा त्या सणातून लोक किती आनंद घेताय, एक होताय वा जल्लोष साजरा करताय ह्याचा विचार प्रथमता प्राधान्य देणारा ठरतो. ती गोष्ट गणेश उत्सवाच्या बाबतीत अगदी चोख घडतेय. लोक अगदी आनंदात गणेशाच्या मूर्ती च स्वागत करतात. जेवायला सुद्धा एकत्र न बसणारा परीवार, सकाळ-संध्याकाळ ची आरती, प्रसाद अगदी आनंदाने एकत्र येवून करतो. दूरदूरचे राहणारे मित्र, भाऊ एकत्र येतात, दहा दिवसासाठी का होईना पण एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद घेतात. इकडे मंडळे आपला पाहुणा म्हणून दिवस रात्र कष्ट घेवून साऱ्या गोष्टीच नियोजन करतात. सार जस व्हावं तसच..
पण प्रकृतीचा हा नियमच आहे, जिथे योग्य, खर असत तिथे खोटेपणा, अयोग्यता असतेच. ह्या उत्सवाला सुद्धा काळिमा लागलेलीच आहे. काही मंडळातले जुगार, मद्य हे प्रकार बर्याच ठिकाणी दिसतात. जे सर्वार्थाने चुकीचेच आहेत. पण तो कलंक काही फक्त गणेश उत्सवावरचाच नाही. तो गैरप्रकार होवू नये, शिवाय पर्यावरणाला धरूनच आपल्या बेताने आणि मताने गणेश उत्सव व्हायला हवेत. पण ह्याला कावे वगेरे म्हणणार्यांनी त्यांच्या द्वेष्ट्या वृत्तीला आवर घालावा. कोण खर आणि कोण भंपक हे समजण्या इतकी सर्व महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे..
गणपती बाप्पा मोरया !!
No comments:
Post a Comment