दि. १९ सप्टेंबरच्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा वेध...!
नक्की वाचा आणि शेअर करा...!
***
नक्की वाचा आणि शेअर करा...!
***
’’मातीची बकरी हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. चुकीच्या प्रथेला विधायक पर्याय देण्याचा विचार आणि विरोधासाठी विरोध यात फरक आहे. भिन्न भिन्न धर्मांचे सहअस्तित्त्व त्यांच्यातील वेगळेपणा आणि विवेक जपत मान्य करायला हवे. त्यातील भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.’’
बकरी ईद आणि त्यानिमित्त उठलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवरील ही विधाने आहेत अंनिसच्या हमीद दाभोळकर यांची. प्राणीजगतात दुतोंडी गांडूळ नावाचा एक प्रकार असतो. परंतु सद्यस्थितीत त्याची जागा स्वतःला पुरोगामी, बुद्धिमंत वगैरे म्हणवणार्याांनी घेतली आहे की काय अशी शंका त्यांच्या वागण्या-बोलण्यातून नेहमीच येत असते. आताचा मुद्दाही बकरी ईद या मुस्लिमांच्या सणाचा आणि पुरोगाम्यांच्या भूमिकेचा आहे. बकरी ईदला बकर्या कापाव्या की न कापाव्या अथवा शाकाहार विरुद्ध मांसाहार किंवा हिंदू विरुद्ध मुस्लीमहा विषय येथे नसून विषय आहे तो तथाकथित पुरोगाम्यांच्या दुटप्पीपणाचा! नेहमी हिंदू धर्माला विरोध आणि इतरांची पाठराखण करण्याचे कर्तव्य बजावणार्या पुरोगामी दुटप्पीपणाला हमीद दाभोळकरांचे हे वक्तव्य पोषक असेच आहे. नेहमीच पर्यावरणाचे नुकसान, अमके प्रदूषण, तमके प्रदूषण, इकोफ्रेंडली सण अशी कोल्हेकुई करत हिंदूंच्या सणांना विरोध करणार्या या लोकांची मुस्लीमअथवा ख्रिश्चन धर्मियांतील प्रथा परंपरा याविरुद्ध बोलताना मात्र दातखीळ बसते, याचा प्रत्ययही या निमित्ताने सर्वांना आला. आताही हमीदभाईंनी स्वकर्तृत्व नसताना आपण केवळ वडिलांची मनसबदारी चालवत असल्याचे दाखवत मुस्लिमांच्या सणांना विधायक रूप देण्याच्या भानगडीत न पडता सरळसरळ माघार घेतली. याच पुरोगाम्यांच्या मते जशी विनापाण्याची होळी, विनाफटाक्यांची दिवाळी साजरी करता येते तसे मग मातीची, मेणाची अथवा केकची बकरी कापून ईद का साजरी करता येऊ नये? इतकाच मुद्दा आहे. मात्र आपली हिंदूद्रोही भूमिका आणि मुस्लिमांची दाढी कुरवाळण्याची वृत्ती सोडतील ते पुरोगामी कसले? याच मंडळींनी मांढरदेवी किंवा अन्य ठिकाणच्या पशुबळींविरुद्ध आवाज उठवला आणि त्या प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले. येथे त्या पशुबळींचे समर्थन करण्याचाही मुद्दा नाही. मात्र या प्रथा बंद करण्यासाठी चळवळ करणार्या पुरोगाम्यांची बुद्धी बकर्याच्या कुर्बानीत भावार्थ शोधण्याचा शहाजोग सल्ला देते तेव्हा कुठे पेंड खायला जाते, हा प्रश्न विचारण्यास भाग पाडते. तसेच इतरांच्या सणांवेळी यांचा कथित विवेकाचा मार्ग कोणत्या खिंडीत अडकतो हाही प्रश्न येथे निर्माण होतो. बकरी ईदमुळे गरीब मुस्लिमांचे हजारो कोटी रुपये केवळ धार्मिक कारणापायी वाया जातात. त्या पैशांचा उपयोग करून मुस्लिमांसाठीच एखादे विधायक कार्य का कोणी पुरोगामी करत नाही, हाही एक प्रश्नच आहे. परंतु, ज्यांची दुकानदारीच मुळी हिंदू धर्माला विरोध करून चालते ती मंडळी या प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत हेही खरे. तसेच हिंदूंनी पितृपक्षात कावळ्यांना पिंडदान-अन्नदान केले त्याला अंधश्रद्धा म्हणत नावे ठेवणारी जमात ईदच्या कुर्बानीला मात्र श्रद्धा म्हणते तेव्हा यांची पक्षपाती मानसिकता ठळकपणे लक्षात येते.यावरून एवढेच म्हणावेसे वाटते की, ज्या हमीद दलवाई यांच्या नावावरून नरेंद्र दाभोळकरांनी आपल्या मुलाचे नाव हमीद ठेवले ते आणि स्वतः नरेंद्र दाभोळकर जर आज हयात असते, तर हमीद दाभोळकरांच्या या अविवेकी आणि भावार्थी वक्तव्याने मात्र नक्कीच खजील झाले असते.
हिंदू बहुसंख्य असल्यामुळे त्यांच्या सणांत लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होतात व त्यामुळे हिंदूंच्या सणांमुळेही काही प्रमाणात प्रश्न निर्माण होतात. काहीवेळा हे प्रश्न पर्यावरणाचे, स्वच्छतेचे व प्रदूषणाचे असतात. मात्र यात दुरुस्त्या करून आपल्या सणांत सुधारणा करण्याची तयारी दाखवणारे हिंदूदेखील आपल्याला दिसतात. गणपतीमूर्ती दान करणे किंवा घरीच विसर्जित करणे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळून मातीचे गणपती बसवणे, थर्माकोलचे मखर न वापरणे असे पर्याय हिंदूंनी स्वीकारले आहेत. परंतु, याचे श्रेय बदलांसाठी तयार असणार्या सहिष्णु हिंदूंनाच आहे. अंनिस किंवा तत्समपोपटपंची करणार्यांचे यात कोणतेही योगदान नाही परंतु, हिंदूंंचे सण काल्पनिक आहेत असे म्हणणारे किंवा हिंदुत्वाला न मानणारे तसेच हिंदू सणांच्या नावाने नाके मुरडणारे जेव्हा अल्लाह व इब्राहिमच्या अस्तित्वाला, बकरी ईदच्या कथेला सत्य मानून शुभेच्छा देतात तेव्हाच पुरोगामी जमातीच्या बौद्धिक आणि नैतिक दिवाळखोरीचे पितळ उघडे पडते. काही अंनिसवाले तर थेट देवालाच रिटायर करा असे म्हणणारेही होते. याच लोकांनी सत्यनारायणाला विरोध केला, यावर्षी तर कसले तरी फलक झळकावत पंढरपूरच्या वारीतही ही मंडळी घुसली. नुकतेच मदर तेरेसांना त्यांनी केलेल्या तथाकथित दैवी चमत्कारांमुळे ख्रिश्चन पोपने संत घोषित केले. त्यावरही विवेकी, विज्ञाननिष्ठ नि बुद्धिमंत पुरोगाम्यांनी अवाक्षरही काढले नाही की त्याला अंधश्रद्धा म्हणत त्याच्या निर्मूलनाचे महान कार्यही केले नाही. मदर तेरेसाच नव्हे तर ’हालेलुया’ की काहीतरी म्हणत उपचार करण्याचा दावा करणार्या मुंबईतील सेबेस्टियन मार्टिन या ख्रिस्ती धर्मगुरूलाही यांनी कधी विरोध केला नाही. बांग्लादेशात ईदनिमित्त कत्तल केल्यानंतर रक्ताचे पाट वाहिले त्याबद्दलही ही मंडळी सोईस्कर मौन पाळून आहेत, एवढेच नव्हे तर ही घटना खोटी असल्याचा कांगावाही करत आहेत, हे पाहिल्यावर यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. त्यामुळे या पुरोगामीरूपी सरड्यांची धाव केवळ हिंदू धर्मापुरती आणि रंग बदलही केवळ इतरांना पाठबळ देणारा असाच असल्याचे सिद्ध होते! खरे म्हणजे पुरोगामी किंवा अंनिससारख्या चळवळींना विरोध किंवा त्यांची जी खिल्ली उडवली जाते ती त्यांच्या याच दुटप्पीपणामुळे! मात्र ती गोष्ट लक्षात घेऊन आपल्या कार्यक्रम, उपक्रमआणि भूमिकेत बदल करण्यास ही मंडळी तयार नाहीत हेही खरे. असे असताना जे लोक इतर धर्मातील वाईट प्रथा मोडण्यास सांगतात तेव्हा हेच लोक त्यांना जातीयवादाचे लेबल लावून मोकळे होतात किंवा संघ आणि भाजपच्या नावाने गळे काढतात. आताही मुस्लीमराष्ट्रीय मंचने अशी केक कापून बकरी ईद साजरी केली तर त्याला हे लोक धार्मिक तेढ वाढवणारी कृती ठरवत आहेत. मात्र धर्मात बदल, परिवर्तन आवश्यक आहे असे हिंदूंना कानीकपाळी ओरडून सांगणारी हे लोक ईदच्या सणात थोडेसे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यावर का बिथरतात? यामागे काय गौडबंगाल आहे, हे न समजण्याइतका सामान्य माणूस दुधखुळा निश्चितच नाही, हे नक्की.
बकरी ईद आणि त्यानिमित्त उठलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवरील ही विधाने आहेत अंनिसच्या हमीद दाभोळकर यांची. प्राणीजगतात दुतोंडी गांडूळ नावाचा एक प्रकार असतो. परंतु सद्यस्थितीत त्याची जागा स्वतःला पुरोगामी, बुद्धिमंत वगैरे म्हणवणार्याांनी घेतली आहे की काय अशी शंका त्यांच्या वागण्या-बोलण्यातून नेहमीच येत असते. आताचा मुद्दाही बकरी ईद या मुस्लिमांच्या सणाचा आणि पुरोगाम्यांच्या भूमिकेचा आहे. बकरी ईदला बकर्या कापाव्या की न कापाव्या अथवा शाकाहार विरुद्ध मांसाहार किंवा हिंदू विरुद्ध मुस्लीमहा विषय येथे नसून विषय आहे तो तथाकथित पुरोगाम्यांच्या दुटप्पीपणाचा! नेहमी हिंदू धर्माला विरोध आणि इतरांची पाठराखण करण्याचे कर्तव्य बजावणार्या पुरोगामी दुटप्पीपणाला हमीद दाभोळकरांचे हे वक्तव्य पोषक असेच आहे. नेहमीच पर्यावरणाचे नुकसान, अमके प्रदूषण, तमके प्रदूषण, इकोफ्रेंडली सण अशी कोल्हेकुई करत हिंदूंच्या सणांना विरोध करणार्या या लोकांची मुस्लीमअथवा ख्रिश्चन धर्मियांतील प्रथा परंपरा याविरुद्ध बोलताना मात्र दातखीळ बसते, याचा प्रत्ययही या निमित्ताने सर्वांना आला. आताही हमीदभाईंनी स्वकर्तृत्व नसताना आपण केवळ वडिलांची मनसबदारी चालवत असल्याचे दाखवत मुस्लिमांच्या सणांना विधायक रूप देण्याच्या भानगडीत न पडता सरळसरळ माघार घेतली. याच पुरोगाम्यांच्या मते जशी विनापाण्याची होळी, विनाफटाक्यांची दिवाळी साजरी करता येते तसे मग मातीची, मेणाची अथवा केकची बकरी कापून ईद का साजरी करता येऊ नये? इतकाच मुद्दा आहे. मात्र आपली हिंदूद्रोही भूमिका आणि मुस्लिमांची दाढी कुरवाळण्याची वृत्ती सोडतील ते पुरोगामी कसले? याच मंडळींनी मांढरदेवी किंवा अन्य ठिकाणच्या पशुबळींविरुद्ध आवाज उठवला आणि त्या प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले. येथे त्या पशुबळींचे समर्थन करण्याचाही मुद्दा नाही. मात्र या प्रथा बंद करण्यासाठी चळवळ करणार्या पुरोगाम्यांची बुद्धी बकर्याच्या कुर्बानीत भावार्थ शोधण्याचा शहाजोग सल्ला देते तेव्हा कुठे पेंड खायला जाते, हा प्रश्न विचारण्यास भाग पाडते. तसेच इतरांच्या सणांवेळी यांचा कथित विवेकाचा मार्ग कोणत्या खिंडीत अडकतो हाही प्रश्न येथे निर्माण होतो. बकरी ईदमुळे गरीब मुस्लिमांचे हजारो कोटी रुपये केवळ धार्मिक कारणापायी वाया जातात. त्या पैशांचा उपयोग करून मुस्लिमांसाठीच एखादे विधायक कार्य का कोणी पुरोगामी करत नाही, हाही एक प्रश्नच आहे. परंतु, ज्यांची दुकानदारीच मुळी हिंदू धर्माला विरोध करून चालते ती मंडळी या प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत हेही खरे. तसेच हिंदूंनी पितृपक्षात कावळ्यांना पिंडदान-अन्नदान केले त्याला अंधश्रद्धा म्हणत नावे ठेवणारी जमात ईदच्या कुर्बानीला मात्र श्रद्धा म्हणते तेव्हा यांची पक्षपाती मानसिकता ठळकपणे लक्षात येते.यावरून एवढेच म्हणावेसे वाटते की, ज्या हमीद दलवाई यांच्या नावावरून नरेंद्र दाभोळकरांनी आपल्या मुलाचे नाव हमीद ठेवले ते आणि स्वतः नरेंद्र दाभोळकर जर आज हयात असते, तर हमीद दाभोळकरांच्या या अविवेकी आणि भावार्थी वक्तव्याने मात्र नक्कीच खजील झाले असते.
हिंदू बहुसंख्य असल्यामुळे त्यांच्या सणांत लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होतात व त्यामुळे हिंदूंच्या सणांमुळेही काही प्रमाणात प्रश्न निर्माण होतात. काहीवेळा हे प्रश्न पर्यावरणाचे, स्वच्छतेचे व प्रदूषणाचे असतात. मात्र यात दुरुस्त्या करून आपल्या सणांत सुधारणा करण्याची तयारी दाखवणारे हिंदूदेखील आपल्याला दिसतात. गणपतीमूर्ती दान करणे किंवा घरीच विसर्जित करणे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळून मातीचे गणपती बसवणे, थर्माकोलचे मखर न वापरणे असे पर्याय हिंदूंनी स्वीकारले आहेत. परंतु, याचे श्रेय बदलांसाठी तयार असणार्या सहिष्णु हिंदूंनाच आहे. अंनिस किंवा तत्समपोपटपंची करणार्यांचे यात कोणतेही योगदान नाही परंतु, हिंदूंंचे सण काल्पनिक आहेत असे म्हणणारे किंवा हिंदुत्वाला न मानणारे तसेच हिंदू सणांच्या नावाने नाके मुरडणारे जेव्हा अल्लाह व इब्राहिमच्या अस्तित्वाला, बकरी ईदच्या कथेला सत्य मानून शुभेच्छा देतात तेव्हाच पुरोगामी जमातीच्या बौद्धिक आणि नैतिक दिवाळखोरीचे पितळ उघडे पडते. काही अंनिसवाले तर थेट देवालाच रिटायर करा असे म्हणणारेही होते. याच लोकांनी सत्यनारायणाला विरोध केला, यावर्षी तर कसले तरी फलक झळकावत पंढरपूरच्या वारीतही ही मंडळी घुसली. नुकतेच मदर तेरेसांना त्यांनी केलेल्या तथाकथित दैवी चमत्कारांमुळे ख्रिश्चन पोपने संत घोषित केले. त्यावरही विवेकी, विज्ञाननिष्ठ नि बुद्धिमंत पुरोगाम्यांनी अवाक्षरही काढले नाही की त्याला अंधश्रद्धा म्हणत त्याच्या निर्मूलनाचे महान कार्यही केले नाही. मदर तेरेसाच नव्हे तर ’हालेलुया’ की काहीतरी म्हणत उपचार करण्याचा दावा करणार्या मुंबईतील सेबेस्टियन मार्टिन या ख्रिस्ती धर्मगुरूलाही यांनी कधी विरोध केला नाही. बांग्लादेशात ईदनिमित्त कत्तल केल्यानंतर रक्ताचे पाट वाहिले त्याबद्दलही ही मंडळी सोईस्कर मौन पाळून आहेत, एवढेच नव्हे तर ही घटना खोटी असल्याचा कांगावाही करत आहेत, हे पाहिल्यावर यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. त्यामुळे या पुरोगामीरूपी सरड्यांची धाव केवळ हिंदू धर्मापुरती आणि रंग बदलही केवळ इतरांना पाठबळ देणारा असाच असल्याचे सिद्ध होते! खरे म्हणजे पुरोगामी किंवा अंनिससारख्या चळवळींना विरोध किंवा त्यांची जी खिल्ली उडवली जाते ती त्यांच्या याच दुटप्पीपणामुळे! मात्र ती गोष्ट लक्षात घेऊन आपल्या कार्यक्रम, उपक्रमआणि भूमिकेत बदल करण्यास ही मंडळी तयार नाहीत हेही खरे. असे असताना जे लोक इतर धर्मातील वाईट प्रथा मोडण्यास सांगतात तेव्हा हेच लोक त्यांना जातीयवादाचे लेबल लावून मोकळे होतात किंवा संघ आणि भाजपच्या नावाने गळे काढतात. आताही मुस्लीमराष्ट्रीय मंचने अशी केक कापून बकरी ईद साजरी केली तर त्याला हे लोक धार्मिक तेढ वाढवणारी कृती ठरवत आहेत. मात्र धर्मात बदल, परिवर्तन आवश्यक आहे असे हिंदूंना कानीकपाळी ओरडून सांगणारी हे लोक ईदच्या सणात थोडेसे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यावर का बिथरतात? यामागे काय गौडबंगाल आहे, हे न समजण्याइतका सामान्य माणूस दुधखुळा निश्चितच नाही, हे नक्की.
- महेश पुराणिक
No comments:
Post a Comment