दि. १७ ऑक्टोबरच्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा वेध...!!!
***
जात मिटेल?
.
कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील पंचायत विभागातील पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणार्या परीक्षेत दोन अनाथ मुलींना जातीचा रकाना रिकामा ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.’आपल्या देशात जन्मापासून सर्वांच्याच सोबत येणारी आणि मृत्युनंतरही न जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे जात! जातिव्यवस्थेची मुळे खोलवर रुजलेल्या आपल्या देशात ’जात नाही ती जात’, ही म्हणही त्याचमुळे अस्तित्त्वात आली! हीच जातिप्रथा, स्पृश्य-अस्पृश्य, उच्च-नीच भेदभाव मिटविण्यासाठी महात्मा बसवेश्वरांपासून सर्वच संतांनी, महात्मा फुले, गो. ग. आगरकर, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आदी समाजसुधारकांनी मोलाचे प्रयत्न केले. कालौघात जाती-जातीत दरी निर्माण करणार्या अनेक वाईट प्रथा संपल्या. यात जसा समाजसुधारकांच्या कार्याचा आणि सरकारचा वाटा आहे, तेवढाच वाटा हिंदू समाजाच्या सहिष्णु वृत्तीचा आणि परिवर्तनशील ’मानसा’चाही आहे. परंतु, आजकाल जाती-जातींच्या अस्मिता पुन्हा एकदा टोकदार होत चालल्या असून प्रत्येक जात आपलीस्वतःची वेगळी चूल मांडू पाहतेय. अशावेळी जाती निर्मूलनाचे कार्य कोणी करायचे? जाती खरोखर कधी मिटणार नाहीतच का? जातीमुक्त हिंदू समाजासाठी काय प्रयत्न करायला हवेत? असे प्रश्न साहजिकच आपल्यापुढे उभे राहतात. याच संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाकडे पाहावे लागेल. ज्या कोणाला मग तो अनाथ असो वा सनाथ त्याला स्वेच्छेने जातविषयक रकाना सर्वच ठिकाणी रिकामा ठेवण्याची परवानगी मिळू शकेल का? त्या दृष्टीने पुढे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचवेळी, केवळ कागदोपत्री जात नाकारल्याने जात मिटेल का, मना-मनांतील जातींचे काय? त्या नष्ट होतील का? हा प्रश्नही येथे विचारला जाऊ शकतो. परंतु, उत्तुंग यश मिळविण्यासाठी सुरुवातीला केलेले छोटेसे प्रयत्न, उचललेले पहिले पाऊलही महत्त्वाचेच असते. यासाठी जे खरोखर जातीव्यवस्था मिटवण्याची इच्छाशक्ती बाळगतात त्यांनी यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम-उपक्रमनेटाने चालवले पाहिजेत. त्यानंतरच जातीचे वास्तव मिटू शकते, अन्यथा नाही.
***
धर्मांधांवर वाचक हवा
.
मुंबईजवळील भिवंडीमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत दुर्गापूजेची कमान आडवी आल्याने ती तोडून पुन्हा कायदा व सुव्यवस्था राखणार्या पोलिसांवरच धर्मांध मुस्लिमांनी पेट्रोलबॉम्ब टाकण्याची भयंकर घटना घडली. गेल्या कित्येक वर्षात शासनकर्त्यांकडून मुस्लिमांच्या केल्या गेलेल्या लांगुलचालनाचाच हा परिणामसमजायला हवा. त्यामुळे आपण काहीही केले तरी आपल्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही, ही मुजोर वृत्ती धर्मांध मुस्लिमांमध्ये वाढली. तसेच ऐनवेळी अशी घातक शस्त्रास्त्रे त्यांच्याकडे कुठून येतात? की अशा घटना नियोजन करूनच घडवल्या जातात? यामागे केवळ दहशत पसरविण्याचा उद्देश असतो की आणखी काही? याचीही चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेही आपल्या देशात कधी गणेशोत्सव तर कधी शिवजयंती तर कधी दुर्गा पूजा अशा उत्सवात धर्मांध शक्तींना जोर चढतो आणि त्या आपल्या कुटील कारवाया पार पाडतात. मागेही आझाद मैदानातील मुस्लिमांच्या मोर्चात पोलिसांना लक्ष्य केले गेले होते. याआधीही पोलिसांना जाळून मारण्याची कृती याच धर्मांध शक्तींनी केली होती. तेव्हाच त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली असती तर आजचा प्रसंग उद्भवला नसता. तसेच हिंदूंमध्ये जी सहिष्णु आणि उदार वृत्ती आढळते त्याचाही अभाव मुस्लीमधर्मियांत दिसतो. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती असहिष्णु वृत्ती ते आपल्या कृतीतून दर्शवून देतात, याचाही विचार सरकार आणि पोलिसांनी करायला हवा. ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीतही असेच होते. आता मुस्लिमांतील तलाक प्रथेविरुद्ध केंद्राने सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली, त्यालाही मुस्लिमांनी धार्मिक कायदा आणि कुराण व शरियतविरोधी ठरवत अमान्यतेचा सूर लावला. आपल्याला आपल्या मनमानी पद्धतीने जगायला मिळावे अशी त्यांची मानसिकता यातून दिसते. मोहरमनिमित्तच्या मिरवणुकीत कायदा व राज्यव्यवस्थेला आपण जुमानत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहेच, पण या वृत्तीचा बंदोबस्त करायचा कोणी? यावर कोणी पुरोगामी बुद्धिवंत कधी चर्चा करताना दिसत नाहीत. यातून त्यांचाही दुटप्पीपणा प्रकर्षाने समोर येतो. अशा प्रकारच्या घटनांवर आता सरकारनेच उपाययोजना करून, कायद्याचा धाक निर्माण करायला पाहिजे तरच धर्मांध शक्तींवर वचक बसू शकतो.
- महेश पुराणिक
***
जात मिटेल?
.
कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील पंचायत विभागातील पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणार्या परीक्षेत दोन अनाथ मुलींना जातीचा रकाना रिकामा ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.’आपल्या देशात जन्मापासून सर्वांच्याच सोबत येणारी आणि मृत्युनंतरही न जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे जात! जातिव्यवस्थेची मुळे खोलवर रुजलेल्या आपल्या देशात ’जात नाही ती जात’, ही म्हणही त्याचमुळे अस्तित्त्वात आली! हीच जातिप्रथा, स्पृश्य-अस्पृश्य, उच्च-नीच भेदभाव मिटविण्यासाठी महात्मा बसवेश्वरांपासून सर्वच संतांनी, महात्मा फुले, गो. ग. आगरकर, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आदी समाजसुधारकांनी मोलाचे प्रयत्न केले. कालौघात जाती-जातीत दरी निर्माण करणार्या अनेक वाईट प्रथा संपल्या. यात जसा समाजसुधारकांच्या कार्याचा आणि सरकारचा वाटा आहे, तेवढाच वाटा हिंदू समाजाच्या सहिष्णु वृत्तीचा आणि परिवर्तनशील ’मानसा’चाही आहे. परंतु, आजकाल जाती-जातींच्या अस्मिता पुन्हा एकदा टोकदार होत चालल्या असून प्रत्येक जात आपलीस्वतःची वेगळी चूल मांडू पाहतेय. अशावेळी जाती निर्मूलनाचे कार्य कोणी करायचे? जाती खरोखर कधी मिटणार नाहीतच का? जातीमुक्त हिंदू समाजासाठी काय प्रयत्न करायला हवेत? असे प्रश्न साहजिकच आपल्यापुढे उभे राहतात. याच संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाकडे पाहावे लागेल. ज्या कोणाला मग तो अनाथ असो वा सनाथ त्याला स्वेच्छेने जातविषयक रकाना सर्वच ठिकाणी रिकामा ठेवण्याची परवानगी मिळू शकेल का? त्या दृष्टीने पुढे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचवेळी, केवळ कागदोपत्री जात नाकारल्याने जात मिटेल का, मना-मनांतील जातींचे काय? त्या नष्ट होतील का? हा प्रश्नही येथे विचारला जाऊ शकतो. परंतु, उत्तुंग यश मिळविण्यासाठी सुरुवातीला केलेले छोटेसे प्रयत्न, उचललेले पहिले पाऊलही महत्त्वाचेच असते. यासाठी जे खरोखर जातीव्यवस्था मिटवण्याची इच्छाशक्ती बाळगतात त्यांनी यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम-उपक्रमनेटाने चालवले पाहिजेत. त्यानंतरच जातीचे वास्तव मिटू शकते, अन्यथा नाही.
***
धर्मांधांवर वाचक हवा
.
मुंबईजवळील भिवंडीमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत दुर्गापूजेची कमान आडवी आल्याने ती तोडून पुन्हा कायदा व सुव्यवस्था राखणार्या पोलिसांवरच धर्मांध मुस्लिमांनी पेट्रोलबॉम्ब टाकण्याची भयंकर घटना घडली. गेल्या कित्येक वर्षात शासनकर्त्यांकडून मुस्लिमांच्या केल्या गेलेल्या लांगुलचालनाचाच हा परिणामसमजायला हवा. त्यामुळे आपण काहीही केले तरी आपल्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही, ही मुजोर वृत्ती धर्मांध मुस्लिमांमध्ये वाढली. तसेच ऐनवेळी अशी घातक शस्त्रास्त्रे त्यांच्याकडे कुठून येतात? की अशा घटना नियोजन करूनच घडवल्या जातात? यामागे केवळ दहशत पसरविण्याचा उद्देश असतो की आणखी काही? याचीही चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेही आपल्या देशात कधी गणेशोत्सव तर कधी शिवजयंती तर कधी दुर्गा पूजा अशा उत्सवात धर्मांध शक्तींना जोर चढतो आणि त्या आपल्या कुटील कारवाया पार पाडतात. मागेही आझाद मैदानातील मुस्लिमांच्या मोर्चात पोलिसांना लक्ष्य केले गेले होते. याआधीही पोलिसांना जाळून मारण्याची कृती याच धर्मांध शक्तींनी केली होती. तेव्हाच त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली असती तर आजचा प्रसंग उद्भवला नसता. तसेच हिंदूंमध्ये जी सहिष्णु आणि उदार वृत्ती आढळते त्याचाही अभाव मुस्लीमधर्मियांत दिसतो. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती असहिष्णु वृत्ती ते आपल्या कृतीतून दर्शवून देतात, याचाही विचार सरकार आणि पोलिसांनी करायला हवा. ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीतही असेच होते. आता मुस्लिमांतील तलाक प्रथेविरुद्ध केंद्राने सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली, त्यालाही मुस्लिमांनी धार्मिक कायदा आणि कुराण व शरियतविरोधी ठरवत अमान्यतेचा सूर लावला. आपल्याला आपल्या मनमानी पद्धतीने जगायला मिळावे अशी त्यांची मानसिकता यातून दिसते. मोहरमनिमित्तच्या मिरवणुकीत कायदा व राज्यव्यवस्थेला आपण जुमानत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहेच, पण या वृत्तीचा बंदोबस्त करायचा कोणी? यावर कोणी पुरोगामी बुद्धिवंत कधी चर्चा करताना दिसत नाहीत. यातून त्यांचाही दुटप्पीपणा प्रकर्षाने समोर येतो. अशा प्रकारच्या घटनांवर आता सरकारनेच उपाययोजना करून, कायद्याचा धाक निर्माण करायला पाहिजे तरच धर्मांध शक्तींवर वचक बसू शकतो.
- महेश पुराणिक
No comments:
Post a Comment