दि. ०४ ऑक्टोबरच्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा लेख...!
***
पाकप्रेमाची उबळ, कशासाठी?
उरी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे अश्रूथांबत नाही तोच आणि त्याच्या प्रत्युत्तरासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर केलेल्या हल्ल्याचा आनंद विरत नाही, तोच देशातील रंगेल आणि रगेल कलाकार मंडळींना पाकप्रेमाची उबळ आली आणि ते पाकिस्तानी कलाकार काय दहशतवादी आहेत काय, असे कर्कश्शआवाजात किंचाळू लागले. यातील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक हे केवळ आपल्या चित्रपटाच्या कमाईसाठी, आर्थिक फायद्यासाठीच अशी विधाने करत आहेत, यात तिळमात्र शंका नाही. ज्यांना देशाची लोकभावना आणि देशाशी काही एक देणेघेणे नाही तीच मंडळी यात आघाडीवर आहेत. परंतु, ज्या देशातून भारतात अगदी त्याच्या जन्मापासून दहशतवाद्यांचीच निर्यात झाली, ज्या देशाने भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरला कायमरक्तरंजित ठेवण्याचेच कुटिल कारस्थान रचले, ज्या देशाने आपल्या नापाक इराद्यांनी भारतात कित्येक बॉम्बस्फोट घडवले, शेकडो निरपराध्यांचे बळी घेतले, आपल्या जॉंबाज जवानांचे अमूल्य असे जीवन हिरावून घेतले, त्या देशातील थिल्लर कलाकारांबद्दल कोणाला कळवळा वाटणे हे कशाचे लक्षण मानायचे? आपल्या देशात स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणविणार्या ज्या करंट्यांचे पेव फुटले आहे, ते पाहता त्यांच्याकडून दुसरी कुठली अपेक्षा करणार? केवळ ’बीईंग ह्यूमन’चे टी शर्ट घालून अथवा दोन-चार लोकांना कथित मदत करून कोणी स्वत:ला देशापेक्षा, देशाच्या अभिमानापेक्षा, सार्वभौमत्वापेक्षाही मोठा समजत असेल, तर देशातील नागरिकांनीच अशा गणंगांना वेळीच आवरणे योग्य ठरेल, अन्यथा तथाकथित मानवाधिकाराच्या आणि कलाकारांना सीमेचे बंधन नसते या भंपक तत्त्वाच्या आड ही मंडळी देशप्रेमआणि देशभक्तीलाही तिलांजली देतील.
भारतात इकडे पाकिस्तानी कलाकारांसाठी पायघड्या अंथरण्याची स्पर्धा लागलेली असताना तिकडे पाकिस्तानात मात्र भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली. एवढेच नव्हे, तर पाकी कलाकार देखील या बंदीचे समर्थन करताना दिसले. यातील हमजा अलीने भारतीय चित्रपट आणि कलाकारांवर बहिष्कार टाकण्याच्या गमजा मारल्या, त्याचवेळी आपण भारतीयांपेक्षा अधिक सुसंस्कृत असल्याचे ना’पाक’ तारेही तोडले. भारतात येऊन भारतीयांच्या जीवावर मोठे होण्याचे स्वप्न पाहणार्या फवाद खान नामक बांडगुळाने तर ’’भारतीयांपेक्षा आमचे मन मोठे आहे, बॉलिवूड काय कोणाच्या बापाचे आहे काय,’’ असे म्हणत आपल्या देशाला साजेशी अशी मुजोर आणि कृतघ्न प्रवृत्ती दाखवली. पाकिस्तानी कलाकारांच्या या प्रतिक्रिया पाहता, अशांना बॉलिवूडमध्ये गोंजारायची काही एक गरज नसल्याचे स्पष्ट होते. कारण येथील जनतेने त्यांना कितीही डोक्यावर घेतले तरी ते शेवटी आपल्याविरुद्धच आग ओकणार. मात्र तरीही आपल्याकडील काही विदुषकांची पाकड्यांची तळी उचलण्याची हौस काही फिटता फिटत नाही, ते भारत-पाकमधील सांस्कृतिक वगैरे देवाणघेवाणीची आणि त्यातून संबंध सुधारण्याची वटवट करत आहेत. अशावेळी ज्या देशाच्या रक्तातच भारताबद्दल असलेला द्वेष वाहत आहे, तो देश कधीही सुधारणार नाही, हे या पाकभगतांना सांगणे आवश्यक ठरते.
पाकिस्तानी कलाकारांसाठी लाळघोटेपणा करणार्या भारतीय कलाकारांना अभिनेते नाना पाटेकर यांनी मात्र त्यांच्या खास शैलीत, ’’आपल्या देशाचे जवान हेच खरे नायक असून देशापुढे आम्ही नकली कलाकार चिल्लर, चिलटाएवढे आहोत, आमची किंमत शुन्य आहे,’’ अशा शब्दांत फटकारले आहे. ज्याला देशाबद्दल आणि सीमेवर लढणार्या जवानांबद्दल आदर आणि अभिमान आहे, तीच व्यक्ती असे बोलु शकते, केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अंगविक्षेप करणारी मर्कटे मात्र असे कधी बोलताना आढळत नाहीत.
पाकिस्तानी कलाकारांना विरोध का? या कलाकारांना पाकिस्तानात हाकलल्याने दहशतवादी हल्ले थांबतील का? असा प्रश्नही येथे कोणी विचारू शकतो. त्याआधी हे समजून घेणे आवश्यक आहे की, हे पाकिस्तानी कलाकार भारतात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून येतात, असे सांगितले जाते. त्याअर्थी हे लोक प्रामाणिक(?) असायला हवेत. म्हणजेच हे कलाकार त्यांच्या देशात आपल्या कोट्यवधींच्या उत्पन्नावर त्याच मोठ्या प्रमाणात करही भरत असणार. तर मुद्दा असा आहे की, पाकिस्तानकडून होत असलेली दहशतवादाची निर्यात ही काही बिगरपैशाची अथवा बिनभांडवली होत नसते. त्यासाठी शस्त्र, बंदुका, बॉम्ब वगैरे जीवघेणे साहित्य विकत घेण्यासाठी पैसाही ओतावा लागतो आणि या दहशतवाद्यांना कोणता देश पैसा पुरवतो या सत्याचा भारताने संपूर्ण जगासमोर अनेकदा बुरखा फाडला आहे. जगातील दहशतवादाच्या सर्वच काळ्या कारवायांमागे याच पाकिस्तानी कलाकारांचा विखारी देश असल्याचे सिद्ध झाले, त्यामुळे आता अमेरिका आणि ब्रिटनमध्येही पाकिस्तानला ’दहशतवादी देश’ घोषित करण्याची मागणी करण्यात आली. जे पाकिस्तानी कलाकार भारतात कामकरतात त्यांच्या उत्पन्नातील कर पाकिस्तानी सरकारकडे जमा होतो, त्यानंतर तो पैसा पाक सरकारकडून आयएसआयपर्यंत जातो. मग आयएसआयमार्फत हाच पैसा तेथील दहशतवादी गटांना पुरवला जातो, ज्यातून हत्यारे, बॉम्ब आदी भयानक गोष्टी खरेदी केल्या जातात. अन मग त्यानंतर सुरू होतो तो मानवतेचा बळी घेणारा नंगानाच! अशा प्रकारे आपण भारतीयांनी या कलाकारांना कायदेशीरपणे पैसे देऊन पोसल्याचे नासके फळ पुन्हा आपल्यालाच परत मिळते. ज्याचा पुढचा अंक रविवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी आगळीक करुन आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दाखवला. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊ देणे अथवा कामकरू देणे कितपत योग्य आहे? याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे.
रामायणात रामाला सेतुबंधनासाठी मदत करणार्या खारीची कथा सांगितली जाते. तिने लावलेल्या हातभारामुळे सेतुबंधनाचे थोडेसे का होईना कामपूर्ण झाल्याचे आपण मानतो. तसेच भले आपण दिलेले तिकिटाचे पैसे शत्रूराष्ट्रातील दहशतवाद्यांच्या त्या शस्त्रांच्या किमतीपुढे नगण्य असतील, पण म्हणून आपण आपल्या देशाच्या शत्रूला खारीएवढी तरी मदत का म्हणून करायची? रामायणातील खारीने केलेली मदत सत्कारणी तरी लागली होती, पण पाकिस्तानी कलाकारांना येथे कामदेऊन, त्यांचे घर भरून आपण तो पैसा आणि आपला हातभार दुष्कारणी का म्हणून लावायचा? पाकिस्तानी कलाकारही आपल्या मनात काही फार चांगले भाव ठेऊन येथे येतात असेही नाही. येथील युवकांनी डोक्यावर घेतलेल्या आणि भारतीयांच्या तुकड्यावर मोठा होऊ पाहणार्या आतिफ अस्लमया गायकाने, ’’भारत हा काफरांचा देश असून आपण तेथे केवळ पैसे कमावण्यासाठी जातो. दसरा-दिवाळीशी माझा काही संबंध नाही, मी शुभेच्छा देणार नाही,’’ असे म्हणत नमकहरामीची हद्द पार केली. गुलामअली नामक पाकिस्तानी पिलावळीने तर एकदा भारतीयांची यथेच्छ अवहेलना करत एका भारतीय अधिकार्यासमोरच ’काफिर कुत्ते’ म्हणत टीका केली होती. ही आठवण सुभाष सरीन या जाणकारांनी सांगितली आहे. नंतर गुलामअलीवर भारतात बंदीही घातली गेली. तरीही येथील काही शुंभांना त्याच्या मैफिलीचे आयोजन करून माना डोलावण्याची हुक्की येतच असते. येथे आपण साप किंवा विंचवांशी कितीही सौहार्दाने वागलो तरी ते शेवटी आपल्यावरच उलटतात, आपली बेईमान जात दाखवतात हे नेहमीसाठी मनात कोरुन ठेवले पाहिजे.
पाकिस्तानी कलाकारांबाबत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लोक त्या देशासाठी हेरगिरी करत नसतील याची खात्री तरी कोण देणार? हे लोक इकडे येताना काही ’’आम्ही हेर आहोत,’’ असे सांगून तर येत नसतात, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? पहिल्या महायुद्धातील ’माता हारी’ या हेरगिरी करणार्या आणि नृत्यांगना असलेल्या हेराचे उदाहरण येथे पुरेसे बोलके आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे जे लोक भारतात पैसे कमावून पाकिस्तानात गेल्यावर भारताबद्दलच अपशब्द बोलतात, त्यांचे लांगुलचालन तरी आपणच का म्हणून करायचे? आपल्या देशातही कित्येक प्रतिभावंत अभिनेते, गायक, कलाकार आहेत, ज्यांना संधी मिळण्याची प्रतीक्षा आहे, त्यामुळे आता अशांनाच प्राधान्याने कामदेण्याचा विचार करायला हवा. याच संदर्भात भारतीय चित्रपट निर्मात्यांची संस्था-’इम्पा’कडूनही पाकिस्तानी कलाकारांना भारतात कामकरू न देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला, ज्याला सर्वांनीच पाठिंबा द्यायला हवा आणि पाकिस्तानवर कला-क्रीडा क्षेत्रातही असहकाराचेच धोरण अवलंबावे.
- महेश पुराणिक
***
पाकप्रेमाची उबळ, कशासाठी?
उरी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे अश्रूथांबत नाही तोच आणि त्याच्या प्रत्युत्तरासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर केलेल्या हल्ल्याचा आनंद विरत नाही, तोच देशातील रंगेल आणि रगेल कलाकार मंडळींना पाकप्रेमाची उबळ आली आणि ते पाकिस्तानी कलाकार काय दहशतवादी आहेत काय, असे कर्कश्शआवाजात किंचाळू लागले. यातील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक हे केवळ आपल्या चित्रपटाच्या कमाईसाठी, आर्थिक फायद्यासाठीच अशी विधाने करत आहेत, यात तिळमात्र शंका नाही. ज्यांना देशाची लोकभावना आणि देशाशी काही एक देणेघेणे नाही तीच मंडळी यात आघाडीवर आहेत. परंतु, ज्या देशातून भारतात अगदी त्याच्या जन्मापासून दहशतवाद्यांचीच निर्यात झाली, ज्या देशाने भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरला कायमरक्तरंजित ठेवण्याचेच कुटिल कारस्थान रचले, ज्या देशाने आपल्या नापाक इराद्यांनी भारतात कित्येक बॉम्बस्फोट घडवले, शेकडो निरपराध्यांचे बळी घेतले, आपल्या जॉंबाज जवानांचे अमूल्य असे जीवन हिरावून घेतले, त्या देशातील थिल्लर कलाकारांबद्दल कोणाला कळवळा वाटणे हे कशाचे लक्षण मानायचे? आपल्या देशात स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणविणार्या ज्या करंट्यांचे पेव फुटले आहे, ते पाहता त्यांच्याकडून दुसरी कुठली अपेक्षा करणार? केवळ ’बीईंग ह्यूमन’चे टी शर्ट घालून अथवा दोन-चार लोकांना कथित मदत करून कोणी स्वत:ला देशापेक्षा, देशाच्या अभिमानापेक्षा, सार्वभौमत्वापेक्षाही मोठा समजत असेल, तर देशातील नागरिकांनीच अशा गणंगांना वेळीच आवरणे योग्य ठरेल, अन्यथा तथाकथित मानवाधिकाराच्या आणि कलाकारांना सीमेचे बंधन नसते या भंपक तत्त्वाच्या आड ही मंडळी देशप्रेमआणि देशभक्तीलाही तिलांजली देतील.
भारतात इकडे पाकिस्तानी कलाकारांसाठी पायघड्या अंथरण्याची स्पर्धा लागलेली असताना तिकडे पाकिस्तानात मात्र भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली. एवढेच नव्हे, तर पाकी कलाकार देखील या बंदीचे समर्थन करताना दिसले. यातील हमजा अलीने भारतीय चित्रपट आणि कलाकारांवर बहिष्कार टाकण्याच्या गमजा मारल्या, त्याचवेळी आपण भारतीयांपेक्षा अधिक सुसंस्कृत असल्याचे ना’पाक’ तारेही तोडले. भारतात येऊन भारतीयांच्या जीवावर मोठे होण्याचे स्वप्न पाहणार्या फवाद खान नामक बांडगुळाने तर ’’भारतीयांपेक्षा आमचे मन मोठे आहे, बॉलिवूड काय कोणाच्या बापाचे आहे काय,’’ असे म्हणत आपल्या देशाला साजेशी अशी मुजोर आणि कृतघ्न प्रवृत्ती दाखवली. पाकिस्तानी कलाकारांच्या या प्रतिक्रिया पाहता, अशांना बॉलिवूडमध्ये गोंजारायची काही एक गरज नसल्याचे स्पष्ट होते. कारण येथील जनतेने त्यांना कितीही डोक्यावर घेतले तरी ते शेवटी आपल्याविरुद्धच आग ओकणार. मात्र तरीही आपल्याकडील काही विदुषकांची पाकड्यांची तळी उचलण्याची हौस काही फिटता फिटत नाही, ते भारत-पाकमधील सांस्कृतिक वगैरे देवाणघेवाणीची आणि त्यातून संबंध सुधारण्याची वटवट करत आहेत. अशावेळी ज्या देशाच्या रक्तातच भारताबद्दल असलेला द्वेष वाहत आहे, तो देश कधीही सुधारणार नाही, हे या पाकभगतांना सांगणे आवश्यक ठरते.
पाकिस्तानी कलाकारांसाठी लाळघोटेपणा करणार्या भारतीय कलाकारांना अभिनेते नाना पाटेकर यांनी मात्र त्यांच्या खास शैलीत, ’’आपल्या देशाचे जवान हेच खरे नायक असून देशापुढे आम्ही नकली कलाकार चिल्लर, चिलटाएवढे आहोत, आमची किंमत शुन्य आहे,’’ अशा शब्दांत फटकारले आहे. ज्याला देशाबद्दल आणि सीमेवर लढणार्या जवानांबद्दल आदर आणि अभिमान आहे, तीच व्यक्ती असे बोलु शकते, केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अंगविक्षेप करणारी मर्कटे मात्र असे कधी बोलताना आढळत नाहीत.
पाकिस्तानी कलाकारांना विरोध का? या कलाकारांना पाकिस्तानात हाकलल्याने दहशतवादी हल्ले थांबतील का? असा प्रश्नही येथे कोणी विचारू शकतो. त्याआधी हे समजून घेणे आवश्यक आहे की, हे पाकिस्तानी कलाकार भारतात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून येतात, असे सांगितले जाते. त्याअर्थी हे लोक प्रामाणिक(?) असायला हवेत. म्हणजेच हे कलाकार त्यांच्या देशात आपल्या कोट्यवधींच्या उत्पन्नावर त्याच मोठ्या प्रमाणात करही भरत असणार. तर मुद्दा असा आहे की, पाकिस्तानकडून होत असलेली दहशतवादाची निर्यात ही काही बिगरपैशाची अथवा बिनभांडवली होत नसते. त्यासाठी शस्त्र, बंदुका, बॉम्ब वगैरे जीवघेणे साहित्य विकत घेण्यासाठी पैसाही ओतावा लागतो आणि या दहशतवाद्यांना कोणता देश पैसा पुरवतो या सत्याचा भारताने संपूर्ण जगासमोर अनेकदा बुरखा फाडला आहे. जगातील दहशतवादाच्या सर्वच काळ्या कारवायांमागे याच पाकिस्तानी कलाकारांचा विखारी देश असल्याचे सिद्ध झाले, त्यामुळे आता अमेरिका आणि ब्रिटनमध्येही पाकिस्तानला ’दहशतवादी देश’ घोषित करण्याची मागणी करण्यात आली. जे पाकिस्तानी कलाकार भारतात कामकरतात त्यांच्या उत्पन्नातील कर पाकिस्तानी सरकारकडे जमा होतो, त्यानंतर तो पैसा पाक सरकारकडून आयएसआयपर्यंत जातो. मग आयएसआयमार्फत हाच पैसा तेथील दहशतवादी गटांना पुरवला जातो, ज्यातून हत्यारे, बॉम्ब आदी भयानक गोष्टी खरेदी केल्या जातात. अन मग त्यानंतर सुरू होतो तो मानवतेचा बळी घेणारा नंगानाच! अशा प्रकारे आपण भारतीयांनी या कलाकारांना कायदेशीरपणे पैसे देऊन पोसल्याचे नासके फळ पुन्हा आपल्यालाच परत मिळते. ज्याचा पुढचा अंक रविवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी आगळीक करुन आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दाखवला. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊ देणे अथवा कामकरू देणे कितपत योग्य आहे? याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे.
रामायणात रामाला सेतुबंधनासाठी मदत करणार्या खारीची कथा सांगितली जाते. तिने लावलेल्या हातभारामुळे सेतुबंधनाचे थोडेसे का होईना कामपूर्ण झाल्याचे आपण मानतो. तसेच भले आपण दिलेले तिकिटाचे पैसे शत्रूराष्ट्रातील दहशतवाद्यांच्या त्या शस्त्रांच्या किमतीपुढे नगण्य असतील, पण म्हणून आपण आपल्या देशाच्या शत्रूला खारीएवढी तरी मदत का म्हणून करायची? रामायणातील खारीने केलेली मदत सत्कारणी तरी लागली होती, पण पाकिस्तानी कलाकारांना येथे कामदेऊन, त्यांचे घर भरून आपण तो पैसा आणि आपला हातभार दुष्कारणी का म्हणून लावायचा? पाकिस्तानी कलाकारही आपल्या मनात काही फार चांगले भाव ठेऊन येथे येतात असेही नाही. येथील युवकांनी डोक्यावर घेतलेल्या आणि भारतीयांच्या तुकड्यावर मोठा होऊ पाहणार्या आतिफ अस्लमया गायकाने, ’’भारत हा काफरांचा देश असून आपण तेथे केवळ पैसे कमावण्यासाठी जातो. दसरा-दिवाळीशी माझा काही संबंध नाही, मी शुभेच्छा देणार नाही,’’ असे म्हणत नमकहरामीची हद्द पार केली. गुलामअली नामक पाकिस्तानी पिलावळीने तर एकदा भारतीयांची यथेच्छ अवहेलना करत एका भारतीय अधिकार्यासमोरच ’काफिर कुत्ते’ म्हणत टीका केली होती. ही आठवण सुभाष सरीन या जाणकारांनी सांगितली आहे. नंतर गुलामअलीवर भारतात बंदीही घातली गेली. तरीही येथील काही शुंभांना त्याच्या मैफिलीचे आयोजन करून माना डोलावण्याची हुक्की येतच असते. येथे आपण साप किंवा विंचवांशी कितीही सौहार्दाने वागलो तरी ते शेवटी आपल्यावरच उलटतात, आपली बेईमान जात दाखवतात हे नेहमीसाठी मनात कोरुन ठेवले पाहिजे.
पाकिस्तानी कलाकारांबाबत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लोक त्या देशासाठी हेरगिरी करत नसतील याची खात्री तरी कोण देणार? हे लोक इकडे येताना काही ’’आम्ही हेर आहोत,’’ असे सांगून तर येत नसतात, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? पहिल्या महायुद्धातील ’माता हारी’ या हेरगिरी करणार्या आणि नृत्यांगना असलेल्या हेराचे उदाहरण येथे पुरेसे बोलके आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे जे लोक भारतात पैसे कमावून पाकिस्तानात गेल्यावर भारताबद्दलच अपशब्द बोलतात, त्यांचे लांगुलचालन तरी आपणच का म्हणून करायचे? आपल्या देशातही कित्येक प्रतिभावंत अभिनेते, गायक, कलाकार आहेत, ज्यांना संधी मिळण्याची प्रतीक्षा आहे, त्यामुळे आता अशांनाच प्राधान्याने कामदेण्याचा विचार करायला हवा. याच संदर्भात भारतीय चित्रपट निर्मात्यांची संस्था-’इम्पा’कडूनही पाकिस्तानी कलाकारांना भारतात कामकरू न देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला, ज्याला सर्वांनीच पाठिंबा द्यायला हवा आणि पाकिस्तानवर कला-क्रीडा क्षेत्रातही असहकाराचेच धोरण अवलंबावे.
- महेश पुराणिक
No comments:
Post a Comment